शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

औरंगाबादकरांनो आरोग्य सांभाळा, ७ वर्षांनंतर जुलैने वाढविला ‘ताप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : शहरात तब्बल ७ वर्षांनंतर जुलै महिन्यात रेकाॅर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. शहरवासीयांना गेल्या सहा ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : शहरात तब्बल ७ वर्षांनंतर जुलै महिन्यात रेकाॅर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. शहरवासीयांना गेल्या सहा दिवसांपासून अगदी मे महिन्याप्रमाणे उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. अशा तापदायक वातावरणामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य जपण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

शहरात १ जुलै २०१४ मध्ये ३६.६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात ३६ अंशापेक्षा कमी तापमान राहिले. परंतु तब्बल ७ वर्षांनंतर यंदा जुलै महिन्यात पुन्हा एकदा कमाल तापमानाचा पारा ३६ अंशावर गेला. शहरात ७ जुलै रोजी ३६.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला, मात्र एक-दोन दिवस हजेरी लावून पाऊस गायब झाला आहे. अशा परिस्थितीत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाअभावी तापमान वाढीला नागरिकांना समोरे जावे लागत आहे. ढगाळ वातावरणात उकाड्यामुळे घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर ओढवत आहे.

------

असा मोडला ‘जुलै’चा रेकाॅर्ड

वर्ष ----कमाल तापमान

२०१३--३२.०

२०१४-३६.६

२०१५- ३५.६

२०१६-३१.५

२०१७-३३.६

२०१८-३४.०

२०१९-३४.९

२०२०-३२.६

२०२१-३६.१

----

सरासरी तापमानात सहा अंशांची वाढ

जुलै महिन्यात यंदा सरासरी तापमानात सहा अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. मे महिन्याप्रमाणे जुलैमध्ये तापमानाची नोंद झाली आहे.

------

आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज

मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणात वाढलेला उकाडा कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

------

आरोग्य सांभाळा

गेल्या चार दिवसांपासून उकाडा वाढला आहे. मुंबईप्रमाणे वातावरण जाणवत आहे. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे, सकस आहार घ्यावा. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.

- डाॅ. पराग अंभोरे

------

मान्सून पुन्हा सक्रिय

५ जुलैपर्यंत मान्सून पूर्ण देशात पोहोचतो, परंतु सध्या राजस्थानच्या अलीकडेच मान्सून आहे. त्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. पुढचे १२ दिवस पावसाचे आहेत. त्यामुळे सध्या होणारी लाही-लाही शांत होईल.

- श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ