शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

औरंगाबाद ‘झेडपी’ने धरले शिक्षकांना वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:47 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्र्यरत सव्वानऊशे शिक्षक चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात विविध शिक्षक संघटनांनी आंदोलने केली. अनेकदा शिक्षणाधिकारी, ‘सीईओ’, जि.प. अध्यक्षांना निवेदने दिली; परंतु मागील सहा महिन्यांपासून यापैकी एकाही शिक्षकाचे प्रकरण अद्याप निकाली काढण्यात आले नाही.

ठळक मुद्दे८५१ प्रस्ताव पात्र : चटोपाध्याय वेतनश्रेणीचे भिजत घोंगडे; आंदोलनालाही दाद देईना प्रशासन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्र्यरत सव्वानऊशे शिक्षक चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात विविध शिक्षक संघटनांनी आंदोलने केली. अनेकदा शिक्षणाधिकारी, ‘सीईओ’, जि.प. अध्यक्षांना निवेदने दिली; परंतु मागील सहा महिन्यांपासून यापैकी एकाही शिक्षकाचे प्रकरण अद्याप निकाली काढण्यात आले नाही. उलट प्राप्त प्रस्तावांनुसार शिक्षकांना नवीन शासन निर्णयानुसार, की जुन्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ द्यावा, याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आल्यामुळे शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.शासन निर्णयानुसार सलग १२ वर्षे सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीनुसार वरिष्ठश्रेणी व २४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यास निवडश्रेणी लागू केली जाते. यासाठी १२ व २४ वर्षांची सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांचे जि.प. शिक्षण विभागाकडे ९१६ प्रस्ताव प्राप्त झाले. प्राप्त प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती प्रस्तावांची छाननी करून अंतिम यादी तयार केली जाते. शिक्षण विभागाने ९१६ पैकी ८५१ प्रस्ताव पात्र व ६५ प्रस्ताव अपात्र ठरविले. तथापि, २३ आॅक्टोबर २०१७ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयामध्ये सदरील वेतनश्रेणीचा लाभ देण्यापूर्वी संबंधित शिक्षकांच्या शाळा या शाळासिद्धीनुसार ‘ए’ ग्रेड असाव्यात, उच्च माध्यमिक शिक्षकांच्या इयत्ता ९ वी व १० वीचा निकाल ८० टक्क्यांपेक्षा अधिक असावा, असे निर्देश आहेत. सदरील शासन निर्णयापूर्वी जे पात्र शिक्षक आहेत, त्यांना या योजनेचा लाभ द्यावा की ४ एप्रिल १९९० च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार लाभ द्यावा, याबद्दलचे मार्गदर्शन जि.प. प्रशासनाने शालेय शिक्षण विभागाकडे मागितले आहे.चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी काही पात्र शिक्षक हे राखीव जागांवर नियुक्त झाले आहेत. त्यांनी १२, तसेच २४ वर्षांची सेवा पूर्ण केलेली आहे; पण त्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे अशा शिक्षकांची आरक्षणाच्या बिंदूवर झालेली नियुक्ती शंकास्पद आहे. वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ देण्यासाठी अशा शिक्षकांची जात पडताळणी होणे गरजेचे असल्याचे मतही ‘सीईओ’ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नोंदविले असून, सदरील वेतनश्रेणीचे प्रकरण गुंडाळण्यात आले आहे. यामुळे शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सामान्य शिक्षकांमध्ये प्रशासनाप्रती संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या आडमुठ्या धोरणाचा शिक्षकांकडून निषेधयासंदर्भात शिक्षक नेते मधुकर वालतुरे, प्राथमिक शिक्षक समितीचे विजय साळकर, प्राथमिक शिक्षक संघाचे राजेश हिवाळे, शिक्षक सेनेचे प्रभाकर पवार, दीपक पवार आदींनी सोमवारी सायंकाळी प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेचा निषेध केला. जे शिक्षक २३ आॅक्टोबर २०१७ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयापूर्वी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी पात्र आहेत त्यांना अन्य जिल्हा परिषदांनी या योजनेचा लाभ दिलेला आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्हा परिषदेने लाभ देण्यास काहीही हरकत नव्हती. शिक्षकांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. आंदोलनावेळी ‘सीईओ’ आर्दड यांनी चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे लवकरच निकाली काढण्याचे दिलेले आश्वासन मग आम्ही खोटे समजायचे काय, असा सवालही या नेत्यांनी उपस्थित केला.