शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

औरंगाबाद : मुख्य जबाबदारांवर कारवाई होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:38 IST

कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या मिटमिट्यातील नागरिकांना झोडपून काढणाºया पोलिसी कारवाईचा फटका पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना बसला. मात्र, मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश ज्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले तसेच ही वाहने नेण्यासाठी महापालिकेचे जे अधिकारी मिटमिट्यात होते, त्यांच्यावर काय कारवाई होणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. मुळात कचºयाची समस्या ज्यांच्यामुळे निर्माण झाली ते महापालिका आयुक्त आणि पदाधिकारी मोकाट असून, त्यांच्यावर राज्य शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

ठळक मुद्देकळीचा ‘कचरा’ बाजूलाच : पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांची विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या मिटमिट्यातील नागरिकांना झोडपून काढणाºया पोलिसी कारवाईचा फटका पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना बसला. मात्र, मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश ज्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले तसेच ही वाहने नेण्यासाठी महापालिकेचे जे अधिकारी मिटमिट्यात होते, त्यांच्यावर काय कारवाई होणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. मुळात कचºयाची समस्या ज्यांच्यामुळे निर्माण झाली ते महापालिका आयुक्त आणि पदाधिकारी मोकाट असून, त्यांच्यावर राज्य शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.गेल्या २८ दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर कचºयाचे ढीग साचले आहेत. यावर महापालिकेच्या पदाधिकारी आणि आयुक्तांना तोडगा काढता आलेला नाही. ७ मार्च रोजी मिटमिट्यामध्ये महापालिका आयुक्त मुगळीकर यांच्या आदेशाने कचºयाची वाहने निघाली. नागरिकांनी विरोध केला. पोलीस आणि नागरिकांमध्ये दगडफेकीच्या घटना होऊन संघर्ष निर्माण झाला. यामध्ये पोलिसांनी नागरिकांनाच बदडून काढले.नारेगाव येथील डेपोत कचरा टाकण्यासाठी परिसरातील नागरिकांना महापालिकेला चार महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीत महापालिकेचे आयुक्त, प्रशासन आणि पदाधिकाºयांनी कोणताही तोडगा काढला नाही. कचºयाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचे गांभीर्य महापालिकेला नव्हते. चार महिन्यांची मुदत संपताच नारेगावकरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा अंदाज येण्याइतपत वकूब महापालिका आयुक्त आणि पदाधिकाºयांकडे नसल्याचे स्पष्ट झाले. कचºयाची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना धाडले. त्यांनी पंचसूत्री जाहीर केली. मात्र, या पंचसूत्रीचीही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. यामुळे कचºयाच्या प्रश्नाआधी आणि नंतरही महापालिका गंभीर नसल्याचे दिसले. कचरा प्रश्न निर्माण करून हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याबरोबरच मिटमिट्यातील नागरिकांवर पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ महापालिका प्रशासनानेच आणल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांवर बळाचा वापर करण्याचा निषेधार्थ होता. आणि त्याचे फळप पोलीस आयुक्त यादव यांना मिळाले. मग कचºयाच्या या प्रश्नातून महापालिकेचे आयुक्त मोकाट कसे काय राहू शकतील, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना लोकप्रतिनिधींनीही मिटमिट्यातील अत्याचाराकडे लक्ष़ वेधले. मात्र, शहरातील कचºयाची जी मूळ समस्या आहे, तो प्रश्न आणि त्याला जबाबदार असणाºयांवरील कारवाईचा मुद्दा बाजूलाच राहिला आहे.कचरा प्रश्नाला मूळ दोषी असलेले महापालिका आयुक्त, प्रशासन आणि पदाधिकारी बाजूलाच राहिले. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाच दोषी ठरवून कारवाई करण्यात आली हे धक्कादायक आहे. पोलिसांच्या अत्याचाराचे समर्थन करता येणार नाही आणि नागरिकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीचेही समर्थन होऊ शकत नाही. मात्र, या दोन्ही घटनेला कारणीभूत असलेल्या घटकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ते मात्र मोकाटच दिसत आहेत. त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आता पुढे येत आहे.कचºयाच्या प्रश्नावरून लक्षविचलित करण्याचा प्रयत्नमिटमिटा गावातील नागरिकांना मारहाण केल्यामुळे पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांवर कारवाई केल्यानंतर कचºयाचा प्रश्न सुटणार आहे का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. केवळ कचºयावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येत आहेत. तेव्हा टक्केवारीत अडकलेले महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाºयांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाने कोणताही आमदार, खासदार या दोषींवर कारवाई करण्याची आग्रही मागणी करीत नाही हे विशेष.दोषींना शिक्षा मिळाली पाहिजेकचºयाच्या प्रश्नात दोषी असणाºया सर्वांनाच योग्य ते शासन झाले पाहिजे. शहरातील कचºयामुळे नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पाऊस पडल्यास सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रोगराई पसरण्याचा धोका आहे. यामुळे कचºयाच्या प्रश्नात हलगर्जीपणा करणाºया अधिकारी, पदाधिकाºयांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. तरच काहीसा दिलासा मिळू शकतो. नाही तर ‘पहिले पाढे पंचावन्न’ प्रमाणे सर्व काही विसरून जातील.