शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Aurangabad Violence : दंगलीत होरपळलेल्यांना शासकीय मदतीची घोषणा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:48 IST

ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले. दंगलीच्या ४८ तासांनंतरही राज्य शासनाकडून मदतीची कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी राज्यात दंगल उसळल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला शासनाकडून मदत जाहीर झालेली आहे. औरंगाबादच्या बाबतीत राज्य शासन वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका का घेत आहे, असा संतप्त सवाल दंगलीत होरपळलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दंगलीत ज्या व्यापाऱ्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत, त्यातील बहुतांश व्यापारी उधारीत माल आणणारे आहेत. अनेकांनी तर विमाही काढलेला नाही. शेकडो वाहने जळाली. त्यातील ९० टक्के वाहनांचा विमा काढलेला नाही. दंगलीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. मोठे व्यापारी हा त्रास सहन करू शकतील. मात्र, छोट्या व्यापाऱ्यांचे काय? त्यांना आर्थिक मदत कोण करणार... ज्या नागरिकांची घरे जाळण्यात आली. ती कुटुंबे उघड्यावर आली. त्यांना शासन सढळ हाताने मदत करणार नाही का...? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

दंगलीत दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यात एक १७ वर्षीय तरुण होता. या कुटुंबियांना अद्याप शासनाने आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. यापूर्वीच्या अनेक दंगलींमध्ये राज्य शासनानेच मदतीची घोषणा केली आहे. दंगलीच्या ४८ तासांनंतरही शासनाने घोषणा का केली नाही. गृहराज्यमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. पोलिसांनी प्राथमिक पंचनामे तयार करून अहवालही पाठवून दिला.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसState Governmentराज्य सरकारAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद