शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Aurangabad Violence : शिवसेनेच्या निषेध मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 14:24 IST

मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहखात्याने औरंगाबादमधील दंगलीच्या घटनेकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल खैरे यांनी करत पोलीसांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चास औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली.

औरंगाबाद : पोलीस आणि गृहखात्याच्या विरोधात शनिवारी शहरात निषेध मोर्चा काढण्याची घोषणा खा. चंद्रकांत खैरे आणि संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली होती. या मोर्चाला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 

मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहखात्याने औरंगाबादमधील दंगलीच्या घटनेकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल खैरे यांनी करत पोलीसांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चास औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली.

पत्रकार परिषदेतील मुद्दे खा. खैरे म्हणाले, शुक्रवारी रात्री शहरात झालेली दंगल दोन्ही बाजूने नव्हे तर केवळ एकाच बाजूने घडलेली आहे. आम्ही लोकांचे व पोलिसांचे दंगेखोरांपासून संरक्षण केले. परंतु आता पोलीस आमच्या लोकांना अटक करीत आहेत. त्यामुळे पोलिसांवर आमचा विश्वास राहिला नाही. दंगलीच्या  रात्री पोलिसांनी निष्क्रियता दाखविली, असा आरोपही खा. खैरे यांनी केला. मिटमिट्यात जेव्हा कचऱ्यावरून वाद झाला तेव्हा १५० पोलीस अधिकारी आणि ७०० हून अधिक कर्मचारी तेथे जातात. पण इथे दंगल घडूनही मोजकेच पोलीस कर्मचारी पाठविण्यात आले, असे ते म्हणाले.

पैठणगेट येथून हा मोर्चा निघेल तो गुलमंडी, सिटीचौक, शाहगंज या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. पोलिसांची परवानगी असेल किंवा नसेल हा मोर्चा निघणारच, असेही खैरे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ही दंगल पोलीस यंत्रणेने तर घडविली नाही ना, असा संशय येतो आहे. दंगलीत सर्व रॉकेलमाफिया आणि पत्त्यांचे क्लब चालविणारेच सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नरेंद्र त्रिवेदी, सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने यांची उपस्थिती होती. 

ते जखमी कुठे गेले ते शोधा दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी ३०० हून अधिक जणांवर पॅलेट गोळ्या झाडल्याचा दावा पोलीस करीत आहेत. त्या जखमींना पोलिसांनी शोधले पाहिजे. पोलिसांच्या दाव्यात तथ्य असेल तर त्या गोळ्यांमुळे जखमी झालेल्या दंगलखोरांचा शोध घेऊन त्यांना आतापर्यंत अटक करणे गरजेचे होते. परंतु पोलिसांना त्यातील बोटावर मोजण्याइतकेही दंगलखोर सापडलेले नाहीत. पोलिसांच्या या निष्क्रियतेवरून त्यांच्या भूमिकेचा अंदाज येतो, असा आरोप संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसMorchaमोर्चाAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार