शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

Aurangabad Violence : शिवसेनेच्या निषेध मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 14:24 IST

मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहखात्याने औरंगाबादमधील दंगलीच्या घटनेकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल खैरे यांनी करत पोलीसांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चास औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली.

औरंगाबाद : पोलीस आणि गृहखात्याच्या विरोधात शनिवारी शहरात निषेध मोर्चा काढण्याची घोषणा खा. चंद्रकांत खैरे आणि संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली होती. या मोर्चाला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 

मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहखात्याने औरंगाबादमधील दंगलीच्या घटनेकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल खैरे यांनी करत पोलीसांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चास औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली.

पत्रकार परिषदेतील मुद्दे खा. खैरे म्हणाले, शुक्रवारी रात्री शहरात झालेली दंगल दोन्ही बाजूने नव्हे तर केवळ एकाच बाजूने घडलेली आहे. आम्ही लोकांचे व पोलिसांचे दंगेखोरांपासून संरक्षण केले. परंतु आता पोलीस आमच्या लोकांना अटक करीत आहेत. त्यामुळे पोलिसांवर आमचा विश्वास राहिला नाही. दंगलीच्या  रात्री पोलिसांनी निष्क्रियता दाखविली, असा आरोपही खा. खैरे यांनी केला. मिटमिट्यात जेव्हा कचऱ्यावरून वाद झाला तेव्हा १५० पोलीस अधिकारी आणि ७०० हून अधिक कर्मचारी तेथे जातात. पण इथे दंगल घडूनही मोजकेच पोलीस कर्मचारी पाठविण्यात आले, असे ते म्हणाले.

पैठणगेट येथून हा मोर्चा निघेल तो गुलमंडी, सिटीचौक, शाहगंज या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. पोलिसांची परवानगी असेल किंवा नसेल हा मोर्चा निघणारच, असेही खैरे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ही दंगल पोलीस यंत्रणेने तर घडविली नाही ना, असा संशय येतो आहे. दंगलीत सर्व रॉकेलमाफिया आणि पत्त्यांचे क्लब चालविणारेच सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नरेंद्र त्रिवेदी, सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने यांची उपस्थिती होती. 

ते जखमी कुठे गेले ते शोधा दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी ३०० हून अधिक जणांवर पॅलेट गोळ्या झाडल्याचा दावा पोलीस करीत आहेत. त्या जखमींना पोलिसांनी शोधले पाहिजे. पोलिसांच्या दाव्यात तथ्य असेल तर त्या गोळ्यांमुळे जखमी झालेल्या दंगलखोरांचा शोध घेऊन त्यांना आतापर्यंत अटक करणे गरजेचे होते. परंतु पोलिसांना त्यातील बोटावर मोजण्याइतकेही दंगलखोर सापडलेले नाहीत. पोलिसांच्या या निष्क्रियतेवरून त्यांच्या भूमिकेचा अंदाज येतो, असा आरोप संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसMorchaमोर्चाAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार