शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:10 IST

कचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

ठळक मुद्देमुलांना मारल्या लाठ्या : विद्यार्थी म्हणाले, पोलीसमामा नव्हे, ते तर गुंड; शाळा सुटल्यावर घरी जाताना बेदम मारहाण

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.मिटमिट्यातील दगडफेक व लाठीमारीच्या घटनेला आठ दिवस पूर्ण झाले; पण अजूनही या गावात पोलिसांची भीती कायम आहे. पोलीस अटक करतील या भीतीमुळे अनेक युवक मागील आठ दिवसांपासून गावात आलेच नाहीत. काही कुटुंबे घराला कुलूप लावून परगावी नातेवाईकांकडे मुक्कामी गेले. गावात लहान मुले, तरुणी, बायका,ज्येष्ठ नागरिकच आहेत. अटक केलेली आपली मुले कधी सुटून घरी परत येतील, या आशेने येथील ज्येष्ठ नागरिक दिवस-दिवस प्रतिक्षा करीत आहेत. दुसरीकडे येथील मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत आठवडाभरानंतर आज विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू आला. मात्र, बुधवारी ६२० पैकी केवळ २२१ विद्यार्थीच शाळेत आले होते. लोकमत प्रतिनिधींनी बुधवारी दुपारी शाळेला भेट दिली व मुलांची मने जाणून घेतली. तेव्हा ही मुले आतून कोलमडलेली दिसली. पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गातील मुला-मुलींमध्ये त्यादिवशीच्या घटनेचे भय अजूनही दिसत होते. चौथ्या वर्गातील कृष्णा म्हणाला की, त्याच्या पायावर पोलिसांनी दोन लाठ्या मारल्या. रामकिशन मगर म्हणाला की, शाळा सुटल्यानंतर आम्ही घरी जात होतो, माझ्या पायावर व हातावर पोलिसांनी लाठी मारली. आम्ही खूप घाबरलो होतो. रितेश क्षत्रियच्या पायावरही लाठी मारली होती. नंदिनी नरवडेच्या डोळ्यादेखत पोलिसांनी तिच्या वडिलांना बेदम मारले. पोलिसांची आम्हाला खूप भीती वाटते. ‘पोलीसमामा नव्हे, ते तर गुंड आहेत’, अशा संतप्त प्रतिक्रिया या शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. इयत्ता पाचवीतील ऋतिका म्हणाली की, आम्ही घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेलो होतो, तर पवन साबळे या विद्यार्थ्याने सांगितले की, त्यादिवशीपासून माझे पप्पा घरी आलेच नाहीत. पोलिसांनी माझ्या भावाला धरून नेले हे सांगताना आजमच्या डोळ्यात अश्रू तरळलेहोते. घरातील टी.व्ही., कपाटाच्या काचा, संडासचा दरवाजा फोडला, आईलाही मारले, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. तुमच्यासमोर पोलीस आले, तर तुम्ही काय कराल, या प्रश्नावर बहुतांश विद्यार्थी म्हणाले की, ‘आम्ही बेंच खाली लपू.’ एवढी दहशत या बालकांमध्ये अजूनही दिसून येत आहे.