शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:10 IST

कचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

ठळक मुद्देमुलांना मारल्या लाठ्या : विद्यार्थी म्हणाले, पोलीसमामा नव्हे, ते तर गुंड; शाळा सुटल्यावर घरी जाताना बेदम मारहाण

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.मिटमिट्यातील दगडफेक व लाठीमारीच्या घटनेला आठ दिवस पूर्ण झाले; पण अजूनही या गावात पोलिसांची भीती कायम आहे. पोलीस अटक करतील या भीतीमुळे अनेक युवक मागील आठ दिवसांपासून गावात आलेच नाहीत. काही कुटुंबे घराला कुलूप लावून परगावी नातेवाईकांकडे मुक्कामी गेले. गावात लहान मुले, तरुणी, बायका,ज्येष्ठ नागरिकच आहेत. अटक केलेली आपली मुले कधी सुटून घरी परत येतील, या आशेने येथील ज्येष्ठ नागरिक दिवस-दिवस प्रतिक्षा करीत आहेत. दुसरीकडे येथील मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत आठवडाभरानंतर आज विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू आला. मात्र, बुधवारी ६२० पैकी केवळ २२१ विद्यार्थीच शाळेत आले होते. लोकमत प्रतिनिधींनी बुधवारी दुपारी शाळेला भेट दिली व मुलांची मने जाणून घेतली. तेव्हा ही मुले आतून कोलमडलेली दिसली. पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गातील मुला-मुलींमध्ये त्यादिवशीच्या घटनेचे भय अजूनही दिसत होते. चौथ्या वर्गातील कृष्णा म्हणाला की, त्याच्या पायावर पोलिसांनी दोन लाठ्या मारल्या. रामकिशन मगर म्हणाला की, शाळा सुटल्यानंतर आम्ही घरी जात होतो, माझ्या पायावर व हातावर पोलिसांनी लाठी मारली. आम्ही खूप घाबरलो होतो. रितेश क्षत्रियच्या पायावरही लाठी मारली होती. नंदिनी नरवडेच्या डोळ्यादेखत पोलिसांनी तिच्या वडिलांना बेदम मारले. पोलिसांची आम्हाला खूप भीती वाटते. ‘पोलीसमामा नव्हे, ते तर गुंड आहेत’, अशा संतप्त प्रतिक्रिया या शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. इयत्ता पाचवीतील ऋतिका म्हणाली की, आम्ही घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेलो होतो, तर पवन साबळे या विद्यार्थ्याने सांगितले की, त्यादिवशीपासून माझे पप्पा घरी आलेच नाहीत. पोलिसांनी माझ्या भावाला धरून नेले हे सांगताना आजमच्या डोळ्यात अश्रू तरळलेहोते. घरातील टी.व्ही., कपाटाच्या काचा, संडासचा दरवाजा फोडला, आईलाही मारले, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. तुमच्यासमोर पोलीस आले, तर तुम्ही काय कराल, या प्रश्नावर बहुतांश विद्यार्थी म्हणाले की, ‘आम्ही बेंच खाली लपू.’ एवढी दहशत या बालकांमध्ये अजूनही दिसून येत आहे.