शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:10 IST

कचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

ठळक मुद्देमुलांना मारल्या लाठ्या : विद्यार्थी म्हणाले, पोलीसमामा नव्हे, ते तर गुंड; शाळा सुटल्यावर घरी जाताना बेदम मारहाण

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.मिटमिट्यातील दगडफेक व लाठीमारीच्या घटनेला आठ दिवस पूर्ण झाले; पण अजूनही या गावात पोलिसांची भीती कायम आहे. पोलीस अटक करतील या भीतीमुळे अनेक युवक मागील आठ दिवसांपासून गावात आलेच नाहीत. काही कुटुंबे घराला कुलूप लावून परगावी नातेवाईकांकडे मुक्कामी गेले. गावात लहान मुले, तरुणी, बायका,ज्येष्ठ नागरिकच आहेत. अटक केलेली आपली मुले कधी सुटून घरी परत येतील, या आशेने येथील ज्येष्ठ नागरिक दिवस-दिवस प्रतिक्षा करीत आहेत. दुसरीकडे येथील मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत आठवडाभरानंतर आज विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू आला. मात्र, बुधवारी ६२० पैकी केवळ २२१ विद्यार्थीच शाळेत आले होते. लोकमत प्रतिनिधींनी बुधवारी दुपारी शाळेला भेट दिली व मुलांची मने जाणून घेतली. तेव्हा ही मुले आतून कोलमडलेली दिसली. पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गातील मुला-मुलींमध्ये त्यादिवशीच्या घटनेचे भय अजूनही दिसत होते. चौथ्या वर्गातील कृष्णा म्हणाला की, त्याच्या पायावर पोलिसांनी दोन लाठ्या मारल्या. रामकिशन मगर म्हणाला की, शाळा सुटल्यानंतर आम्ही घरी जात होतो, माझ्या पायावर व हातावर पोलिसांनी लाठी मारली. आम्ही खूप घाबरलो होतो. रितेश क्षत्रियच्या पायावरही लाठी मारली होती. नंदिनी नरवडेच्या डोळ्यादेखत पोलिसांनी तिच्या वडिलांना बेदम मारले. पोलिसांची आम्हाला खूप भीती वाटते. ‘पोलीसमामा नव्हे, ते तर गुंड आहेत’, अशा संतप्त प्रतिक्रिया या शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. इयत्ता पाचवीतील ऋतिका म्हणाली की, आम्ही घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेलो होतो, तर पवन साबळे या विद्यार्थ्याने सांगितले की, त्यादिवशीपासून माझे पप्पा घरी आलेच नाहीत. पोलिसांनी माझ्या भावाला धरून नेले हे सांगताना आजमच्या डोळ्यात अश्रू तरळलेहोते. घरातील टी.व्ही., कपाटाच्या काचा, संडासचा दरवाजा फोडला, आईलाही मारले, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. तुमच्यासमोर पोलीस आले, तर तुम्ही काय कराल, या प्रश्नावर बहुतांश विद्यार्थी म्हणाले की, ‘आम्ही बेंच खाली लपू.’ एवढी दहशत या बालकांमध्ये अजूनही दिसून येत आहे.