शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

औरंगाबाद :दंगा नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:21 IST

दंगेखोर हे काही दुश्मन नसतात, यामुळे त्यांना कशा प्रकारे नियंत्रणात आणावे, यासाठी पोलिसांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाला पुन्हा उजाळा देण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. चार्ली पोलीस बरखास्त करून शहरातील चार एसीपींकडे प्रत्येकी एक दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) तैनात केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दंगेखोर हे काही दुश्मन नसतात, यामुळे त्यांना कशा प्रकारे नियंत्रणात आणावे, यासाठी पोलिसांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाला पुन्हा उजाळा देण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. चार्ली पोलीस बरखास्त करून शहरातील चार एसीपींकडे प्रत्येकी एक दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) तैनात केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी जनसंपर्क वाढवून जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावे, असे आदेश प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला आणि दगडफेकीला जबाबदार धरून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना गुरुवारी शासनाने एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे सोपविला. भारंबे यांनी गुरुवारी रात्री पदभार स्वीकारला आणि आज दुपारी १२ ते २.३० अशी तब्बल अडीच तास शहरातील पोलीस अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस उपायुक्त डॉॅ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह सर्व सहायक पोलीस आयुक्त आणि आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्याचे निरीक्षक, गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम सेल, महिला तक्रार निवारण मंच आदी विभागाचे निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीनंतर भारंबे म्हणाले की, मिटमिटा येथील घटनेप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्व पोेलीस ठाण्यांत कार्यरत पोलिसांना पोलीस म्हणून त्यांचे कर्तव्य काय, दंगलसदृश परिस्थिती प्रशिक्षित पोलिसांनी व्यावसायिक पद्धतीने कशी हाताळावी, याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश सर्व ठाणेप्रमुखांना देण्यात आले.संयमाने बळाचा वापर करावादंगलसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जाताना पोलिसांनी त्यांना देण्यात आलेले सुरक्षा जॅकेट, हेल्मेट, लाठी, ढाल आदी साहित्य सोबत ठेवावे. आवश्यक तेव्हा बळाचा वापर करून समाजकंटकांना त्यांची जागाही पोलिसांनी दाखवावी. मात्र, हे करीत असताना आपण पोलीस आहोत याचे भान मात्र पोलिसांना असणे आवश्यक आहे. त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणानुसार त्यांनी परिस्थिती संयमाने हाताळावी, अशा प्रकारचे विशेष मार्गदर्शन त्यांना देण्यात येणार आहे.