शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

औरंगाबाद :दंगा नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:21 IST

दंगेखोर हे काही दुश्मन नसतात, यामुळे त्यांना कशा प्रकारे नियंत्रणात आणावे, यासाठी पोलिसांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाला पुन्हा उजाळा देण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. चार्ली पोलीस बरखास्त करून शहरातील चार एसीपींकडे प्रत्येकी एक दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) तैनात केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दंगेखोर हे काही दुश्मन नसतात, यामुळे त्यांना कशा प्रकारे नियंत्रणात आणावे, यासाठी पोलिसांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाला पुन्हा उजाळा देण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. चार्ली पोलीस बरखास्त करून शहरातील चार एसीपींकडे प्रत्येकी एक दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) तैनात केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी जनसंपर्क वाढवून जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावे, असे आदेश प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला आणि दगडफेकीला जबाबदार धरून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना गुरुवारी शासनाने एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे सोपविला. भारंबे यांनी गुरुवारी रात्री पदभार स्वीकारला आणि आज दुपारी १२ ते २.३० अशी तब्बल अडीच तास शहरातील पोलीस अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस उपायुक्त डॉॅ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह सर्व सहायक पोलीस आयुक्त आणि आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्याचे निरीक्षक, गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम सेल, महिला तक्रार निवारण मंच आदी विभागाचे निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीनंतर भारंबे म्हणाले की, मिटमिटा येथील घटनेप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्व पोेलीस ठाण्यांत कार्यरत पोलिसांना पोलीस म्हणून त्यांचे कर्तव्य काय, दंगलसदृश परिस्थिती प्रशिक्षित पोलिसांनी व्यावसायिक पद्धतीने कशी हाताळावी, याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश सर्व ठाणेप्रमुखांना देण्यात आले.संयमाने बळाचा वापर करावादंगलसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जाताना पोलिसांनी त्यांना देण्यात आलेले सुरक्षा जॅकेट, हेल्मेट, लाठी, ढाल आदी साहित्य सोबत ठेवावे. आवश्यक तेव्हा बळाचा वापर करून समाजकंटकांना त्यांची जागाही पोलिसांनी दाखवावी. मात्र, हे करीत असताना आपण पोलीस आहोत याचे भान मात्र पोलिसांना असणे आवश्यक आहे. त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणानुसार त्यांनी परिस्थिती संयमाने हाताळावी, अशा प्रकारचे विशेष मार्गदर्शन त्यांना देण्यात येणार आहे.