शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

औरंगाबाद स्मार्ट सिटी कागदावरच; २८३ कोटी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:46 IST

केंद्र शासनाने देशातील मोठ्या शहरांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांसह आयडियल शहर कसे असावे, या दृष्टीने स्मार्ट सिटी योजना तीन वर्षांपूर्वी अमलात आणली. या योजनेंतर्गत औरंगाबाद शहराला आतापर्यंत २८३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतील एक रुपयाही महापालिकेने खर्च केला नाही, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाने देशातील मोठ्या शहरांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांसह आयडियल शहर कसे असावे, या दृष्टीने स्मार्ट सिटी योजना तीन वर्षांपूर्वी अमलात आणली. या योजनेंतर्गत औरंगाबाद शहराला आतापर्यंत २८३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतील एक रुपयाही महापालिकेने खर्च केला नाही, हे विशेष. या निधीवर व्याज जमा करण्याचे काम सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार काम करण्यासाठी बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत एकाही कामाची निविदा महापालिकेने काढलेली नाही. कागदावरील स्मार्ट सिटी प्रत्यक्षात कधी साकारणार, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.महापालिकेची तिजोरी बाराही महिने रिकामीच असते. मागील काही वर्षांपासून महापालिकेचा कारभार फक्त शासनाकडून प्राप्त होणाºया अनुदानावर सुरू आहे. कर्मचाºयांच्या पगारासाठीही मनपाच्या तिजोरीत स्वत:चे पैसे नसतात. अशा परिस्थितीत विकासकामांसाठी निधी नसल्याची ओरड करण्यात येते. महाराष्टÑ शासन, केंद्र शासनाने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक साह्य केले. प्रत्येक योजनेची सोयीस्करपणे ‘वाट’ लावण्याचे काम प्रशासनाने केले.केंद्र शासनाच्या दुसºया टप्प्यात म्हणजेच २०१६ मध्ये औरंगाबाद शहराची निवड स्मार्ट सिटी योजनेत झाली. केंद्राने लगेच निधीही दिला. आतापर्यंत महापालिकेला २८३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेत १८०० कोटी रुपयांची मागणी महापालिकेने केली आहे. यातील ६०० कोटी रुपये शहराच्या मूलभूत सोयी सुविधांवर खर्च करावा, असे केंद्राने नमूद केले आहे.सेफ सिटीचा विसरस्मार्ट सिटींतर्गत सेफ सिटी हा एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अद्याप निविदा काढली नाही. शहरातील काही चौकांमध्ये वाय-फाय सुविधा देण्याचे निश्चित झाले. त्याचीही अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केलेली नाही.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामहापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करावी म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी मनपाला प्राप्त झाला आहे. यासंदर्भातही ठोस निर्णय घेण्यास प्रशासन तयार नाही. स्मार्ट सिटीत बसेस खरेदी करणार, इलेक्ट्रिक बसेस घेणार, खाजगी कंत्राटदार नेमणार अशा घोषणांचा पाऊस प्रशासनाकडून पाडण्यात येतोय.