शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

औरंगाबादची मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढायला हवी

By admin | Updated: June 7, 2014 00:55 IST

औरंगाबाद : रेल्वेगाड्यांची अपुरी संख्या आणि बाराही महिने गर्दी यामुळे औरंगाबाद- मुंबईची कनेक्टिव्हिटी कमी पडत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.

औरंगाबाद : रेल्वेगाड्यांची अपुरी संख्या आणि बाराही महिने गर्दी यामुळे औरंगाबाद- मुंबईची कनेक्टिव्हिटी कमी पडत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादहून मुंबई आणि मुंबईहून औरंगाबादच्या प्रवासी व पर्यटकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढायला पाहिजे. त्यासाठी नवीन रेल्वे, सध्याच्या रेल्वेगाड्यांच्या बोगीमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे.दक्षिण मध्य रेल्वेकडे औरंगाबाद- मुंबई रेल्वे कनेक्टिव्हिटीत वाढ करण्याची मागणी प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून सतत करीत आहेत. औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादजवळ अजिंठा आणि वेरूळ ही जागतिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे मुंबईला भेट देणारे अनेक जण या स्थळांना भेट देण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे औरंगाबाद- मुंबईसाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी योग्य असणे गरजेचे होत आहे. सध्या मुंबईसाठी जनशताब्दी, तपोवन, नंदिग्राम आणि देवगिरी एक्स्प्रेस, तर आठवड्यातून एक दिवस धावणारी अजनी एक्स्प्रेस उपलब्ध आहे; परंतु मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येपुढे या गाड्यांचे आरक्षण कायम वेटिंगवर असल्याचा अनुभव प्रवाशांना येतो. त्यामुळे तिकीट मिळवूनसुद्धा उभे राहूनच मुंबईला जायची वेळ येत आहे. औरंगाबादहून थेट मुंबईला जाणारी जनशताब्दी ही एकमेव आहे. या गाडीच्या बोगी वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे; परंतु त्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.अजनी एक्स्प्रेस नियमित व्हावीगाड्याच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रवाशांना उभे राहूनच मुंबईला जावे लागत आहे. त्यातसुद्धा होणाऱ्या प्रचंड दाटीमुळे प्रवाशांमध्ये वाद होतात. त्यामुळे अजनी एक्स्प्रेस नियमित झाल्यास मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल. -संतोषकुमार सोमाणी,अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनानवीन रेल्वे आवश्यकमुंबईच्या स्थानकांवर जागा कमी असल्याने बोगी वाढविणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे मुंबईसाठी नवीन रेल्वे आवश्यक आहे. नवीन रेल्वे मुंबईला सकाळी १० वाजता पोहोचणारी हवी. त्यामुळे प्रवाशांची अधिक सोय होईल.-ओमप्रकाश वर्मा,अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती