शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद स्थानकावरच रेल्वेत उडाली ठिणगी ?

By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला शनिवारी मध्यरात्री लागलेली आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याविषयी अनेक तर्क लढविले जात आहेत;

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला शनिवारी मध्यरात्री लागलेली आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याविषयी अनेक तर्क लढविले जात आहेत; परंतु औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून रवाना झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी बोगीला भीषण आग लागली. यामुळे औरंगाबाद रेल्वेस्थानकावरच आग लागण्यास सुरुवात झाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.औरंगाबाद रेल्वेस्थानकावर विशेषत: रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या रवाना होताना फोकसच्या मदतीने ब्रेक लायनर जॅम झाल्याने चाकाजवळ ठिणग्या उडत आहेत का, याची पाहणी केली जात असते. असा प्रकार दिसून आल्यावर वेळीच योग्य ती दक्षता घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पॅसेंजर गाडीत नेहमी चोरट्यांचा उपद्रव सुरू असतो. त्यामुळे तांत्रिक दोषांपेक्षा आगीच्या घटनेला चोरट्यांची खोडी कारणीभूत असू शकते. शेगडीवर शेंगा भाजण्याचा प्रकार, विडी-सिगारेट बोगीतच फेकण्याचा प्रकार त्यांच्याकडून होऊ शकतो. सर्वसामान्य प्रवासी फटाके, ज्वालाग्रही पदार्थ सोबत नेतात; परंतु तेही सुरक्षितरीत्या नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आगीचे कारण नेमके स्पष्ट होण्यास फॉरेन्सिकच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या घटनेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून ही गाडी रवाना झाल्यानंतर अवघ्या चार कि.मी.च्या अंतरावर बोगीला भीषण आग लागली. त्यामुळे आगीची सुरुवात औरंगाबाद रेल्वेस्थानकावर झाली, अशी शक्यता नाकारता येत नाही.औरंगाबाद स्थानकाहून रवाना झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी बर्निंग ट्रेनची ही घटना घडली. तांत्रिक दोषांऐवजी ही घटना कशाने घडली हे महत्त्वाचे आहेच; परंतु त्यापेक्षा तर सदर प्रकारास कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीचा विचार मॉडेल रेल्वेस्थानकावरच आगीची परिस्थिती निर्माण करण्याचा हेतू होता, असाही कयास बांधला जात आहे.देखभाल महत्त्वाची ४रेल्वेगाड्यांची देखभाल, दुरुस्ती महत्त्वाची आहे. त्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. रेल्वेस्थानकावर ब्रेक लायनरमधून ठिणग्या उडत आहेत का ? याची रात्रीच्या वेळी पाहणी केली जाते. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर या रेल्वेची योग्य पद्धतीने पाहणी करण्याची गरज होती, असे रेल्वे प्रवासी सेनेचे राज सोमाणी यांनी म्हटले.