शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

औरंगाबाद मनपाला पदोन्नती!

By admin | Updated: September 2, 2014 01:55 IST

औरंगाबाद : महापालिकेची ७ वर्षांची मेहनत फळाला आली असून, शासनाने पालिकेला ‘ड’ मधून ‘क’ वर्गात पदोन्नती दिली आहे. आज सायंकाळी शासनाने राज्यातील ९ पालिकांसह औरंगाबाद

औरंगाबाद : महापालिकेची ७ वर्षांची मेहनत फळाला आली असून, शासनाने पालिकेला ‘ड’ मधून ‘क’ वर्गात पदोन्नती दिली आहे. आज सायंकाळी शासनाने राज्यातील ९ पालिकांसह औरंगाबाद मनपाला पदोन्नती दिल्याचे परिपत्रक जारी केले आहे. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, दरडोई उत्पन्नाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांचा वर्ग बदलला जातो. पालिकेची वर्गवारी बदलल्यानंतर होणाऱ्या फायद्या-तोट्यांबाबत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, याबाबत शासनाने अजून काही कळविले नाही. येत्या आठवड्यात सर्व माहिती समोर येईल. मागील दीड महिन्यापासून पालिका ‘क’ वर्गात यावी, यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू होत्या. २०११ साली झालेली जनगणना, २०१५ साली होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रभाग रचनेमुळे पालिकेचा वर्ग बदलण्याबाबत शासनस्तरावर निर्णयासाठी चर्चेच्या फैरी सुरू होत्या. शहराचा विस्तार वाढला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांनी शहर वाढले आहे. त्या तुलनेत लोकसंख्यादेखील वाढली आहे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार शहरातील ९९ वॉर्डांची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार ११६ इतकी झाली आहे. ‘ड’ वर्गातून मनपा ‘क’ वर्गात आल्यास पालिकेला काही फायदे होणार आहेत. कर्मचारी भरतीची व काही वरिष्ठ संवर्गातील पदांची मान्यता मिळेल. आयुक्त हे पद सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचे होईल. मनपाचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने हद्दवाढ व मालमत्तांची पुन्हा पाहणी केली जाऊ शकते. १४०० कोटींची कामे मनपाद्वारे सुरू आहेत. त्याचे मॉनिटरिंग करण्यासाठी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची जादा पदे मिळतात. गेल्या आठवड्यातच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त मनपाला मिळाले आहेत. त्याच दिवशी पालिका ‘क’ वर्गात आल्याचे स्पष्ट झाले होते. 1पालिकेला वित्त आयोगातून निधी मिळणार नाही. ‘ड’ वर्गातील मनपा व नगरपालिकांनाच निधी मिळतो. आता मनपाला स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागतील. 2प्रशासकीय खर्चात वाढ होऊ शकते. प्रशासकीय खर्चावर नियंत्रण मिळवावे लागेल. शासकीय अनुदानाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.