शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

औरंगाबाद : प्लास्टिक बंदीने उद्योग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:57 IST

राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने तहकूब केल्याने २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली. प्लास्टिक बंदीमुळे औरंगाबादेतील उद्योजक आणि कामगारांना चांगलाच फटका बसतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने तहकूब केल्याने २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली. प्लास्टिक बंदीमुळे औरंगाबादेतील उद्योजक आणि कामगारांना चांगलाच फटका बसतो आहे.बंदी असलेल्या उत्पादनांची निर्मिती थांबवून नव्या उत्पादनांकडे वळावे लागत आहे. नेमक्या कोणत्या उत्पादनावर बंदी आहे, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने कारखाने बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे आर्थिक फटका सहन करण्याची वेळ उद्योजकांवर ओढावली आहे.प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे कप, ग्लास, चमचे, थर्माकोल ग्लास, पत्रावळी आदींवर बंदी आली आहे.औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत हे उत्पादन करणारे जवळपास ८०, तर औद्योगिक वापरासाठीच्या प्लास्टिकचे ६० पेक्षा जास्त उद्योग आहेत. सर्व प्रकारच्या कॅरिबॅगसह या वस्तू तयार करण्यावरही बंदी आहे. त्यामुळे उद्योग अडचणीत आले आहेत. शिवाय कोणत्या उत्पादनांवर बंदी आहे, याविषयी उद्योजकांमध्ये संभ्रम आहे.कारवाईच्या भीतीने सर्वच उत्पादने बंद ठेवले जात असल्याचे उद्योजकांनी सांगितले. प्लास्टिक बंदीमुळे कामगारांच्या नोकºयांवर परिणाम होत आहे. गेली अनेक वर्षे सुरू असलेले उत्पादन बंद करून नव्या उत्पादनांची निर्मिती करावी लागत आहे. महाराष्ट्रात बंदी असली तरी अन्य राज्यांत बंदी नाही, त्यामुळे इतर राज्यांसाठी उत्पादन घेतो, असेही काहींचे म्हणणे आहे....तरच बंदी यशस्वीकारवाईच्या भीतीपोटी अनेकांनी उत्पादन बंद ठेवले आहे. परराज्यांतून येणाºया प्लास्टिक पिशव्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले तर खºया अर्थाने प्लास्टिक बंदी यशस्वी होईल. नेमकी कोणत्या उत्पादनांवर बंदी आहे, याबाबत उद्योजकांत संभ्रम आहे. यासंदर्भात महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शन केले पाहिजे. त्यासाठी आम्ही सहकार्य करू.-किशोर राठी, अध्यक्ष, मसिआपॅकिंग प्लास्टिकवर बंदी नाहीप्लास्टिक पिशव्या, ग्लास, थर्माकोलच्या उत्पादनांवर बंदी आहे. परंतु औद्योगिक उत्पादनांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाºया प्लास्टिकवर बंदी नाही. परंतु सगळा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणावरही सरसकट कारवाई होता कामा नये. - मनीष अग्रवाल, उद्योजकआर्थिक फटकातीन महिन्यांपूर्वी बंदी आली तेव्हाच उद्योग सतर्क झाले होते. बंदी असलेली उत्पादनाची निर्मिती थांबविली आहे. इतर उत्पादनांकडे उद्योजक वळले आहेत. परंतु पूर्वी घेतलेली उत्पादने विक्री झालेली नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून आर्थिक फटका बसू शकतो.- प्रसाद कोकीळ,अध्यक्ष, सीएमआयए

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGovernmentसरकारHigh Courtउच्च न्यायालय