शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : प्लास्टिक बंदीने उद्योग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:57 IST

राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने तहकूब केल्याने २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली. प्लास्टिक बंदीमुळे औरंगाबादेतील उद्योजक आणि कामगारांना चांगलाच फटका बसतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने तहकूब केल्याने २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली. प्लास्टिक बंदीमुळे औरंगाबादेतील उद्योजक आणि कामगारांना चांगलाच फटका बसतो आहे.बंदी असलेल्या उत्पादनांची निर्मिती थांबवून नव्या उत्पादनांकडे वळावे लागत आहे. नेमक्या कोणत्या उत्पादनावर बंदी आहे, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने कारखाने बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे आर्थिक फटका सहन करण्याची वेळ उद्योजकांवर ओढावली आहे.प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे कप, ग्लास, चमचे, थर्माकोल ग्लास, पत्रावळी आदींवर बंदी आली आहे.औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत हे उत्पादन करणारे जवळपास ८०, तर औद्योगिक वापरासाठीच्या प्लास्टिकचे ६० पेक्षा जास्त उद्योग आहेत. सर्व प्रकारच्या कॅरिबॅगसह या वस्तू तयार करण्यावरही बंदी आहे. त्यामुळे उद्योग अडचणीत आले आहेत. शिवाय कोणत्या उत्पादनांवर बंदी आहे, याविषयी उद्योजकांमध्ये संभ्रम आहे.कारवाईच्या भीतीने सर्वच उत्पादने बंद ठेवले जात असल्याचे उद्योजकांनी सांगितले. प्लास्टिक बंदीमुळे कामगारांच्या नोकºयांवर परिणाम होत आहे. गेली अनेक वर्षे सुरू असलेले उत्पादन बंद करून नव्या उत्पादनांची निर्मिती करावी लागत आहे. महाराष्ट्रात बंदी असली तरी अन्य राज्यांत बंदी नाही, त्यामुळे इतर राज्यांसाठी उत्पादन घेतो, असेही काहींचे म्हणणे आहे....तरच बंदी यशस्वीकारवाईच्या भीतीपोटी अनेकांनी उत्पादन बंद ठेवले आहे. परराज्यांतून येणाºया प्लास्टिक पिशव्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले तर खºया अर्थाने प्लास्टिक बंदी यशस्वी होईल. नेमकी कोणत्या उत्पादनांवर बंदी आहे, याबाबत उद्योजकांत संभ्रम आहे. यासंदर्भात महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शन केले पाहिजे. त्यासाठी आम्ही सहकार्य करू.-किशोर राठी, अध्यक्ष, मसिआपॅकिंग प्लास्टिकवर बंदी नाहीप्लास्टिक पिशव्या, ग्लास, थर्माकोलच्या उत्पादनांवर बंदी आहे. परंतु औद्योगिक उत्पादनांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाºया प्लास्टिकवर बंदी नाही. परंतु सगळा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणावरही सरसकट कारवाई होता कामा नये. - मनीष अग्रवाल, उद्योजकआर्थिक फटकातीन महिन्यांपूर्वी बंदी आली तेव्हाच उद्योग सतर्क झाले होते. बंदी असलेली उत्पादनाची निर्मिती थांबविली आहे. इतर उत्पादनांकडे उद्योजक वळले आहेत. परंतु पूर्वी घेतलेली उत्पादने विक्री झालेली नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून आर्थिक फटका बसू शकतो.- प्रसाद कोकीळ,अध्यक्ष, सीएमआयए

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGovernmentसरकारHigh Courtउच्च न्यायालय