शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद ‘समांतर’ जलवाहिनी लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:27 IST

समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी वन विभागाची चार एकर जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मुंबईत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महापालिकेला जागा देण्यावर एकमत झाल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.

ठळक मुद्देमुंबईत उच्चस्तरीय बैठक : वन विभागाकडून चार एकर जागा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी वन विभागाची चार एकर जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मुंबईत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महापालिकेला जागा देण्यावर एकमत झाल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.दोन वर्षांपूर्वी महापालिकेने समांतर जलवाहिनीचे काम औरंगाबाद युटिलिटी कंपनीमार्फत सुरू केले. सध्या महापालिकेचे ज्याठिकाणी पाणी उपसा केंद्र आहे, त्याच्या बाजूलाच वन विभागाची चार एकर जागा आहे. समांतर जलवाहिनीचे जल उपसा केंद्र उभारण्यासाठी ही जागा मिळावी, असा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला होता. यासंदर्भात बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव, सचिव, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बराच वेळ चर्चा झाल्यानंतर महापालिकेला चार एकर जागा देण्यावर एकमत झाले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत मान्यताही दिल्याचे आयुक्त मुगळीकर यांनी सांगितले.समांतर जलवाहिनीचे डिझाईन तयार करताना महापालिकेने जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी पाणीपुरवठा केंद्र उभारण्यासाठी ४ एकर जागेचे नियोजन केले होते. प्रकल्पाची सुरुवात होताच प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावर शासन निर्णय होत नव्हता. सोमवारी शासनाने अंतिम मंजुरी दिली. त्यामुळे भविष्यात महापालिकेने कधीही समांतर जलवाहिनीचा प्रकल्प सुरू केल्यानंतर जागेची अडचण भासणार नाही.मुख्य जलवाहिनीचा प्रश्नजायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत २ हजार मि. मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, असा आग्रहसुद्धा मनपाकडून सुरू आहे. समांतरसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आलेला निधी मागील दहा वर्षांपासून बँकेत पडून आहे. या रकमेवर व्याजापोटी ११३ कोटी रुपये जमा झाले आहेत.