शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

औरंगाबाद ते पैठण रस्ता ‘भारतमाला’ योजनेतूनच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:49 IST

औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले असून ‘भारतमाला’ परियोजनेतूनच या रस्त्याचे काम होणार असल्याचे एनएचएआयच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले असून ‘भारतमाला’ परियोजनेतूनच या रस्त्याचे काम होणार असल्याचे एनएचएआयच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पुढच्या महिन्यात पूर्ण रस्त्याचे अलायमेंट ठरेल. त्यानंतर गावे, नकाशे तयार होतील. सध्या तरी शहराला पाणीपुरवठा करणारी मनपाची जलवाहिनी रुंदीकरणात अडसर ठरते आहे.डीपीआरचे काम करणाºया एजन्सीने अलायमेंटबाबतचा प्राथमिक अहवाल दिला आहे. औरंगाबाद ते पैठण हा रस्ता एनएच क्रमांक २११ लगतच असणार आहे. शेंद्रा ते बिडकीन ते वाळूज असा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ४५ कि़मी.पैकी अर्धा रस्ता रिंगरोडदेखील गणला जाईल.डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या ‘इंडस्ट्री ट्रँगल’ साठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा प्रस्ताव नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ९०० कोटींचा हा प्रकल्प औरंगाबाद ते पैठण मार्गे शेवगाव या रस्त्यासह १९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हे दोन्ही वेगवेगळे रस्ते असताना त्यांचा संयुक्त प्रस्ताव तयार डीपीआर तयार होत आहे. ९०० कोटींचा शेंद्रा ते बिडकीन मार्ग वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित आहे. शिवाय औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचे देखील यात समायोजन झाले आहे. त्यासाठी भूसंपादनासह १ हजार कोटी लागण्याचा अंदाज आहे. सध्या ३० मीटर रुंद तो रस्ता आहे. ३० मीटर नव्याने भूसंपादन केल्यास तो रस्ता नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या निकषाप्रमाणे पूर्ण करता येईल. १९० किलोमीटरच्या कामाला १९०० कोटी रुपये भूसंपादनासह लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे.जालना रोड, बीड बायपास या दोन्ही रस्त्यांची कामे होतील, असा दावा एनएचएआयचे मावळते प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी केला. या प्रकल्पाच्या निविदा अद्याप निघाल्या नाहीत. यावर घोटकर म्हणाले, दिल्ली मुख्यालयात याबाबत हालचाली सुरू आहेत. पैठण ते औरंगाबाद डीपीआरचे काम सुरू झाले आहे. सोलापूर ते धुळे या हायवेच्या कामाला गती मिळालेली आहे. जून २०१८ पर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण खुला होईल, असा दावा त्यांनी केला.