शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

औरंगाबादला डिसेंबरपर्यंत वाढेल २० एमएलडी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली ...

औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून डिसेंबरपर्यंत २० ‘एमएलडी’ने पाणीपुरवठा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

घाटी रुग्णालयात सोमवारी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या हस्तांतरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. औरंगाबादच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या समन्वयासाठी शासनाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. सुनील चव्हाण म्हणाले, औरंगाबादला डिसेंबरपर्यंत २० एमएलडी पाणी वाढविण्याचे नियोजन केले आहे. तर मार्च २०२२ पर्यंत आणखी ३० एमएलडी पाणी वाढविले जाईल. म्हणजे मार्चपर्यंत एकूण ५० एमएलडी पाणी वाढेल, अशा पद्धतीने काम करण्यावर भर आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता

आपले पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता आहे. हा रस्ता तयार होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ३०० कोटी शिर्डी संस्थान आणि ३५० कोटी शासनाच्या निधीतून हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. विद्यापीठात १२ कोटींचा ट्रॅक केला जाणार आहे. त्याचाही प्रस्ताव तयार केला आहे. औट्रम घाटाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. या सर्व गोष्टी औरंगाबादसाठी फायदेशीर ठरतील. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.