शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

औरंगाबादला डिसेंबरपर्यंत वाढेल २० एमएलडी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली ...

औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून डिसेंबरपर्यंत २० ‘एमएलडी’ने पाणीपुरवठा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

घाटी रुग्णालयात सोमवारी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या हस्तांतरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. औरंगाबादच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या समन्वयासाठी शासनाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. सुनील चव्हाण म्हणाले, औरंगाबादला डिसेंबरपर्यंत २० एमएलडी पाणी वाढविण्याचे नियोजन केले आहे. तर मार्च २०२२ पर्यंत आणखी ३० एमएलडी पाणी वाढविले जाईल. म्हणजे मार्चपर्यंत एकूण ५० एमएलडी पाणी वाढेल, अशा पद्धतीने काम करण्यावर भर आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता

आपले पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता आहे. हा रस्ता तयार होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ३०० कोटी शिर्डी संस्थान आणि ३५० कोटी शासनाच्या निधीतून हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. विद्यापीठात १२ कोटींचा ट्रॅक केला जाणार आहे. त्याचाही प्रस्ताव तयार केला आहे. औट्रम घाटाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. या सर्व गोष्टी औरंगाबादसाठी फायदेशीर ठरतील. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.