शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

औरंगाबादला डिसेंबरपर्यंत वाढेल २० एमएलडी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली ...

औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून डिसेंबरपर्यंत २० ‘एमएलडी’ने पाणीपुरवठा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

घाटी रुग्णालयात सोमवारी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या हस्तांतरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. औरंगाबादच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या समन्वयासाठी शासनाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. सुनील चव्हाण म्हणाले, औरंगाबादला डिसेंबरपर्यंत २० एमएलडी पाणी वाढविण्याचे नियोजन केले आहे. तर मार्च २०२२ पर्यंत आणखी ३० एमएलडी पाणी वाढविले जाईल. म्हणजे मार्चपर्यंत एकूण ५० एमएलडी पाणी वाढेल, अशा पद्धतीने काम करण्यावर भर आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता

आपले पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता आहे. हा रस्ता तयार होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ३०० कोटी शिर्डी संस्थान आणि ३५० कोटी शासनाच्या निधीतून हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. विद्यापीठात १२ कोटींचा ट्रॅक केला जाणार आहे. त्याचाही प्रस्ताव तयार केला आहे. औट्रम घाटाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. या सर्व गोष्टी औरंगाबादसाठी फायदेशीर ठरतील. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.