शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

औरंगाबादला डिसेंबरपर्यंत वाढेल २० एमएलडी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली ...

औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून डिसेंबरपर्यंत २० ‘एमएलडी’ने पाणीपुरवठा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

घाटी रुग्णालयात सोमवारी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या हस्तांतरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. औरंगाबादच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या समन्वयासाठी शासनाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. सुनील चव्हाण म्हणाले, औरंगाबादला डिसेंबरपर्यंत २० एमएलडी पाणी वाढविण्याचे नियोजन केले आहे. तर मार्च २०२२ पर्यंत आणखी ३० एमएलडी पाणी वाढविले जाईल. म्हणजे मार्चपर्यंत एकूण ५० एमएलडी पाणी वाढेल, अशा पद्धतीने काम करण्यावर भर आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता

आपले पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता आहे. हा रस्ता तयार होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ३०० कोटी शिर्डी संस्थान आणि ३५० कोटी शासनाच्या निधीतून हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. विद्यापीठात १२ कोटींचा ट्रॅक केला जाणार आहे. त्याचाही प्रस्ताव तयार केला आहे. औट्रम घाटाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. या सर्व गोष्टी औरंगाबादसाठी फायदेशीर ठरतील. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.