शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

औरंगाबादचा कचरा महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:24 IST

औरंगाबाद शहरातील कचरा आता महानगरपालिकेने ग्रामीण भागात टाकायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात डोकेदुखी वाढली आहे. गावकऱ्यांनी कच-यास कडाडून विरोध करून बंड पुकारले आहे. रविवारी पहाटे औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे गावाजवळ मनपाने कचरा आणून टाकल्याचे दिसताच गावकरी संतप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाचोड : औरंगाबाद शहरातील कचरा आता महानगरपालिकेने ग्रामीण भागात टाकायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात डोकेदुखी वाढली आहे.गावकऱ्यांनी कच-यास कडाडून विरोध करून बंड पुकारले आहे. रविवारी पहाटे औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे गावाजवळ मनपाने कचरा आणून टाकल्याचे दिसताच गावकरी संतप्त झाले.सकाळी सरपंच अंकुशराव जावळे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना रोडलगतच कचरा पडलेला दिसला. या कच-याचा घाण वास येत होता. जावळे यांनी तात्काळ गावात येऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावक-यांना याबाबत माहिती दिली व काही क्षणांतच गावकरी संतप्त होऊन सरपंच जावळे यांच्या घरी जमा झाले व याची माहिती पाचोड पोलीस, पैठणचे आमदार संदीपान भुमरे, जि.प. सभापती विलास भुमरे व पैठण तालुका बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यांना दिली.त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.उपसरपंच शिवाजी तागड, बाळासाहेब जावळे, अण्णा पाटील, लहू जावळे, सुदर्शन जावळे, सतीश जावळे, प्रकाश जावळे, रामनाथ जावळे, रामनाथ भावले, दादा चिंतामणी, संदीप बुरकूल, नवनाथ कळमकर आदींनी घटनास्थळावर जाऊन संताप व्यक्त केला.