शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

औरंगाबादचा कचरा महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:24 IST

औरंगाबाद शहरातील कचरा आता महानगरपालिकेने ग्रामीण भागात टाकायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात डोकेदुखी वाढली आहे. गावकऱ्यांनी कच-यास कडाडून विरोध करून बंड पुकारले आहे. रविवारी पहाटे औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे गावाजवळ मनपाने कचरा आणून टाकल्याचे दिसताच गावकरी संतप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाचोड : औरंगाबाद शहरातील कचरा आता महानगरपालिकेने ग्रामीण भागात टाकायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात डोकेदुखी वाढली आहे.गावकऱ्यांनी कच-यास कडाडून विरोध करून बंड पुकारले आहे. रविवारी पहाटे औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे गावाजवळ मनपाने कचरा आणून टाकल्याचे दिसताच गावकरी संतप्त झाले.सकाळी सरपंच अंकुशराव जावळे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना रोडलगतच कचरा पडलेला दिसला. या कच-याचा घाण वास येत होता. जावळे यांनी तात्काळ गावात येऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावक-यांना याबाबत माहिती दिली व काही क्षणांतच गावकरी संतप्त होऊन सरपंच जावळे यांच्या घरी जमा झाले व याची माहिती पाचोड पोलीस, पैठणचे आमदार संदीपान भुमरे, जि.प. सभापती विलास भुमरे व पैठण तालुका बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यांना दिली.त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.उपसरपंच शिवाजी तागड, बाळासाहेब जावळे, अण्णा पाटील, लहू जावळे, सुदर्शन जावळे, सतीश जावळे, प्रकाश जावळे, रामनाथ जावळे, रामनाथ भावले, दादा चिंतामणी, संदीप बुरकूल, नवनाथ कळमकर आदींनी घटनास्थळावर जाऊन संताप व्यक्त केला.