शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : ‘समृद्धी’च्या भूसंपादनावर ‘धर्मा’ प्रकरणाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:21 IST

धुळ्यातील धर्मा पाटील या शेतकºयाने जमीन अधिग्रहणाच्या मावेजात अन्याय झाल्याने मृत्यूला कवटाळले. तशीच वेळ दौलताबादलगतच्या फतियाबाद येथील शेतकºयांवर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या भू-खरेदीत अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देअस्वस्थ : एका बांधावर ९२ लाख, तर लगतच्या बांधावर १२ लाख दर

औरंगाबाद : धुळ्यातील धर्मा पाटील या शेतक-याने जमीन अधिग्रहणाच्या मावेजात अन्याय झाल्याने मृत्यूला कवटाळले. तशीच वेळ दौलताबादलगतच्या फतियाबाद येथील शेतक-यांवर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या भू-खरेदीत अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

फतियाबाद येथील ४४ हून अधिक शेतक-यांनी ७२ एकर जमिनीला भाव मिळत नसल्यामुळे २६ जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. वैजापूरच्या उपविभागीय अधिका-यांनी मध्यस्थी केल्यामुळे शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले. ४४ शेतक-यांच्या जमिनीला १२ लाख रुपये एकरी भाव मिळत असून, त्यांच्या जमिनीलगत ५० ते ९२ लाखांहून अधिकचा एकरी भाव मिळतो आहे. जमिनीचा पोत, पीक, सुपीकता सारखीच असताना फक्त बांध आणि शीघ्रगणक दर व विक्री व्यवहाराच्या दस्ताआधारे शेतक-यांचे असे नुकसान होत आहे, असे मत शेतकरी एक वर्षापासून जिल्हाधिका-यांकडे मांडत आहेत.

तसेच पळशी, कान्हापूर, कच्चीघाटी व महालपिंप्री येथे बाधित जमिनीचे भाव प्रतिएकरी १९ लाख ४० हजार ते २४ लाख इतके आहेत, तर शेजारच्या मौजे वरूड येथे ६९ लाख प्रतिएकर, गंगापूर जहांगीर ८४ लाख असे आहेत. पळशी गाव शहराला लागून आहे. तिथे फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या गावाची जमीन बागायती क्षेत्र धरून त्यानुसार भाव निश्चित करण्यात यावा, अशी मागणी तेथील शेतकरी वर्षभरापासून करीत आहेत. एमएसआरडीसी महसूल प्रशासनाच्या सूचनेनुसार जमीन खरेदीसाठी रक्कम अदा करीत आहे. जमिनींचे मूल्यांकन करताना उत्पन्न, विद्यमान पीक, विहिरी व त्यातील बोअर, खरेदी-व्रिकी व्यवहाराचे दस्तऐवज याचा विचार केला जात आहे. हताश झालेल्या शेतक-यांना वणवण करण्याची वेळ आली आहे.

जिल्हाधिकारी म्हणालेजिल्हाधिकारी एन. के. राम म्हणाले, समृद्धीत भूसंपादनाऐवजी खरेदी होत आहे. धुळ्यातील जमीन अधिग्रहण व समृद्धीचे संपादन यात फरक आहे. खरेदी झाल्यावरच शेतक-यांना रक्कम अदा केली जाणार आहे. माझ्या अधिकाराबाहेरच्या काही मागण्या आहेत. शेतक-यांच्या मागणीबाबत जिल्हा समिती व शासनाकडून अभिप्राय मागविला आहे.