शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

औरंगाबाद : ‘समृद्धी’च्या भूसंपादनावर ‘धर्मा’ प्रकरणाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:21 IST

धुळ्यातील धर्मा पाटील या शेतकºयाने जमीन अधिग्रहणाच्या मावेजात अन्याय झाल्याने मृत्यूला कवटाळले. तशीच वेळ दौलताबादलगतच्या फतियाबाद येथील शेतकºयांवर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या भू-खरेदीत अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देअस्वस्थ : एका बांधावर ९२ लाख, तर लगतच्या बांधावर १२ लाख दर

औरंगाबाद : धुळ्यातील धर्मा पाटील या शेतक-याने जमीन अधिग्रहणाच्या मावेजात अन्याय झाल्याने मृत्यूला कवटाळले. तशीच वेळ दौलताबादलगतच्या फतियाबाद येथील शेतक-यांवर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या भू-खरेदीत अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

फतियाबाद येथील ४४ हून अधिक शेतक-यांनी ७२ एकर जमिनीला भाव मिळत नसल्यामुळे २६ जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. वैजापूरच्या उपविभागीय अधिका-यांनी मध्यस्थी केल्यामुळे शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले. ४४ शेतक-यांच्या जमिनीला १२ लाख रुपये एकरी भाव मिळत असून, त्यांच्या जमिनीलगत ५० ते ९२ लाखांहून अधिकचा एकरी भाव मिळतो आहे. जमिनीचा पोत, पीक, सुपीकता सारखीच असताना फक्त बांध आणि शीघ्रगणक दर व विक्री व्यवहाराच्या दस्ताआधारे शेतक-यांचे असे नुकसान होत आहे, असे मत शेतकरी एक वर्षापासून जिल्हाधिका-यांकडे मांडत आहेत.

तसेच पळशी, कान्हापूर, कच्चीघाटी व महालपिंप्री येथे बाधित जमिनीचे भाव प्रतिएकरी १९ लाख ४० हजार ते २४ लाख इतके आहेत, तर शेजारच्या मौजे वरूड येथे ६९ लाख प्रतिएकर, गंगापूर जहांगीर ८४ लाख असे आहेत. पळशी गाव शहराला लागून आहे. तिथे फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या गावाची जमीन बागायती क्षेत्र धरून त्यानुसार भाव निश्चित करण्यात यावा, अशी मागणी तेथील शेतकरी वर्षभरापासून करीत आहेत. एमएसआरडीसी महसूल प्रशासनाच्या सूचनेनुसार जमीन खरेदीसाठी रक्कम अदा करीत आहे. जमिनींचे मूल्यांकन करताना उत्पन्न, विद्यमान पीक, विहिरी व त्यातील बोअर, खरेदी-व्रिकी व्यवहाराचे दस्तऐवज याचा विचार केला जात आहे. हताश झालेल्या शेतक-यांना वणवण करण्याची वेळ आली आहे.

जिल्हाधिकारी म्हणालेजिल्हाधिकारी एन. के. राम म्हणाले, समृद्धीत भूसंपादनाऐवजी खरेदी होत आहे. धुळ्यातील जमीन अधिग्रहण व समृद्धीचे संपादन यात फरक आहे. खरेदी झाल्यावरच शेतक-यांना रक्कम अदा केली जाणार आहे. माझ्या अधिकाराबाहेरच्या काही मागण्या आहेत. शेतक-यांच्या मागणीबाबत जिल्हा समिती व शासनाकडून अभिप्राय मागविला आहे.