शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

औरंगाबाद - दुबई विमानसेवेची हालचाल; केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाला प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:06 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आगामी काही दिवसांत औरंगाबाद ते थेट दुबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘फ्लाय दुबई’ने दिला आहे.

ठळक मुद्देफ्लाय दुबईने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांना प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच ही विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आगामी काही दिवसांत औरंगाबाद ते थेट दुबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘फ्लाय दुबई’ने दिला आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच ही विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

फ्लाय दुबईने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांना प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये औरंगाबादसह नागपूर आणि पुण्यासाठी थेट दुबईसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. पर्यटन आणि उद्योगाच्या दृष्टीने ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दोन बाबींमुळे ही विमानसेवा सुरू करण्यासाठी वावदेखील आहे. ही शहरे दुबई आणि भारत यांच्यातील विमानसेवा कराराबाहेरील आहेत; परंतु विशेष बाब म्हणून या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या विमानसेवांमुळे रोजगारदेखील उपलब्ध होईल. पर्यटन आणि उद्योग वाढीला हातभार लागेल. दुबईत राहणाऱ्या महाराष्ट्रातील रहिवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, असे प्रस्तावात नमूद आहे.

औरंगाबाद ते दुबई ही विमानसेवा दररोज चालविण्याची तयारी फ्लाय दुबई कंपनीने दर्शविली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास १ जुलैपासून ही सेवा सुरू करण्याचा मानसही कंपनीने व्यक्त केला. यासंदर्भात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत; परंतु फ्लाय दुबईसंदर्भात अधिकृत माहिती प्राप्त नसल्याने काही सांगता येणार नाही.

असे आहे विमानया सेवेसाठी फ्लाय दुबई कंपनीकडून बोर्इंग ७३७-८०० हे विमान प्रवाशांसाठी वापरण्यात येणार आहे. त्याची १७४ प्रवासी व २ हजार ५०० किलो कार्गो वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे औरंगाबादेतील माल थेट दुबईत पाठविण्याची सोय होईल. त्यातून उद्योगवाढीलाही हातभार लागेल. दुबई येथून सकाळी ८.३० वाजता उड्डाण केल्यानंतर दुपारी १२.५० वाजता विमान औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १.४० वाजता दुबईसाठी उड्डाणाचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळGovernmentसरकारInternationalआंतरराष्ट्रीय