शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

औरंगाबाद - दुबई विमानसेवेची हालचाल; केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाला प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:06 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आगामी काही दिवसांत औरंगाबाद ते थेट दुबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘फ्लाय दुबई’ने दिला आहे.

ठळक मुद्देफ्लाय दुबईने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांना प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच ही विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आगामी काही दिवसांत औरंगाबाद ते थेट दुबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘फ्लाय दुबई’ने दिला आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच ही विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

फ्लाय दुबईने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांना प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये औरंगाबादसह नागपूर आणि पुण्यासाठी थेट दुबईसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. पर्यटन आणि उद्योगाच्या दृष्टीने ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दोन बाबींमुळे ही विमानसेवा सुरू करण्यासाठी वावदेखील आहे. ही शहरे दुबई आणि भारत यांच्यातील विमानसेवा कराराबाहेरील आहेत; परंतु विशेष बाब म्हणून या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या विमानसेवांमुळे रोजगारदेखील उपलब्ध होईल. पर्यटन आणि उद्योग वाढीला हातभार लागेल. दुबईत राहणाऱ्या महाराष्ट्रातील रहिवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, असे प्रस्तावात नमूद आहे.

औरंगाबाद ते दुबई ही विमानसेवा दररोज चालविण्याची तयारी फ्लाय दुबई कंपनीने दर्शविली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास १ जुलैपासून ही सेवा सुरू करण्याचा मानसही कंपनीने व्यक्त केला. यासंदर्भात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत; परंतु फ्लाय दुबईसंदर्भात अधिकृत माहिती प्राप्त नसल्याने काही सांगता येणार नाही.

असे आहे विमानया सेवेसाठी फ्लाय दुबई कंपनीकडून बोर्इंग ७३७-८०० हे विमान प्रवाशांसाठी वापरण्यात येणार आहे. त्याची १७४ प्रवासी व २ हजार ५०० किलो कार्गो वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे औरंगाबादेतील माल थेट दुबईत पाठविण्याची सोय होईल. त्यातून उद्योगवाढीलाही हातभार लागेल. दुबई येथून सकाळी ८.३० वाजता उड्डाण केल्यानंतर दुपारी १२.५० वाजता विमान औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १.४० वाजता दुबईसाठी उड्डाणाचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळGovernmentसरकारInternationalआंतरराष्ट्रीय