शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विभाग पुरवणी परीक्षेच्या निकालात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:05 IST

औरंगाबाद : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद ...

औरंगाबाद : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ३९.११ तर बारावीचा २७.६३ टक्के लागला. राज्यात औरंगाबाद विभाग अव्वल ठरल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व प्रभारी विभागीय अध्यक्ष सुगता पुन्ने, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे व शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा राज्याचा दहावीचा एकूण निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा एकूण निकाल १८.४१ टक्के लागला. विभागात दहावीसाठी ६८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २४७८ विद्यार्थी म्हणजेच ३९.११ टक्के उत्तीर्ण झाले. तर बारावीसाठी ६९५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९२९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातून १९१४ म्हणजेच २७.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राज्यभरातून बारावीसाठी विज्ञान, कला, वाणिज्य, एचएससी व्होकेशनल या चार शाखांसाठी ९ विभागीय मंडळातून ६९ हजार ५४२ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६९ हजार २७४ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दहावीसाठी ९ मंडळांतून ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातून ४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९८१२ एवढी असून हे विद्यार्थी एटीकेटी सवलतीद्वारे ११ वी प्रवेशाला पात्र ठरतात. गुणपडताळणी करण्यासाठी २४ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे, असे पुन्ने यांनी सांगितले. यावेळी बोर्डाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

---

अकरावी प्रवेशप्रक्रियेत घेता येईल सहभाग

---

अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला उशीर झाला आहे. तसेच हा निकाल लवकर लागला. त्यामुळे सध्या विशेष फेरी सुरू असून पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले दहावीचे विद्यार्थी अकरावी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होऊ शकतील असे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण म्हणाले. तर उपशिक्षणाधिकारी अनिल साबळे यांनी यासाठी स्वतंत्र फेरीच्या सूचना शासनाकडून मिळतील असे सांगितले.

---