शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

औरंगाबाद विभाग पुरवणी परीक्षेच्या निकालात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:05 IST

औरंगाबाद : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद ...

औरंगाबाद : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ३९.११ तर बारावीचा २७.६३ टक्के लागला. राज्यात औरंगाबाद विभाग अव्वल ठरल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व प्रभारी विभागीय अध्यक्ष सुगता पुन्ने, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे व शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा राज्याचा दहावीचा एकूण निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा एकूण निकाल १८.४१ टक्के लागला. विभागात दहावीसाठी ६८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २४७८ विद्यार्थी म्हणजेच ३९.११ टक्के उत्तीर्ण झाले. तर बारावीसाठी ६९५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९२९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातून १९१४ म्हणजेच २७.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राज्यभरातून बारावीसाठी विज्ञान, कला, वाणिज्य, एचएससी व्होकेशनल या चार शाखांसाठी ९ विभागीय मंडळातून ६९ हजार ५४२ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६९ हजार २७४ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दहावीसाठी ९ मंडळांतून ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातून ४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९८१२ एवढी असून हे विद्यार्थी एटीकेटी सवलतीद्वारे ११ वी प्रवेशाला पात्र ठरतात. गुणपडताळणी करण्यासाठी २४ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे, असे पुन्ने यांनी सांगितले. यावेळी बोर्डाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

---

अकरावी प्रवेशप्रक्रियेत घेता येईल सहभाग

---

अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला उशीर झाला आहे. तसेच हा निकाल लवकर लागला. त्यामुळे सध्या विशेष फेरी सुरू असून पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले दहावीचे विद्यार्थी अकरावी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होऊ शकतील असे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण म्हणाले. तर उपशिक्षणाधिकारी अनिल साबळे यांनी यासाठी स्वतंत्र फेरीच्या सूचना शासनाकडून मिळतील असे सांगितले.

---