शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

औरंगाबाद विभाग पुरवणी परीक्षेच्या निकालात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:05 IST

औरंगाबाद : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद ...

औरंगाबाद : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ३९.११ तर बारावीचा २७.६३ टक्के लागला. राज्यात औरंगाबाद विभाग अव्वल ठरल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व प्रभारी विभागीय अध्यक्ष सुगता पुन्ने, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे व शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा राज्याचा दहावीचा एकूण निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा एकूण निकाल १८.४१ टक्के लागला. विभागात दहावीसाठी ६८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २४७८ विद्यार्थी म्हणजेच ३९.११ टक्के उत्तीर्ण झाले. तर बारावीसाठी ६९५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९२९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातून १९१४ म्हणजेच २७.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राज्यभरातून बारावीसाठी विज्ञान, कला, वाणिज्य, एचएससी व्होकेशनल या चार शाखांसाठी ९ विभागीय मंडळातून ६९ हजार ५४२ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६९ हजार २७४ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दहावीसाठी ९ मंडळांतून ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातून ४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९८१२ एवढी असून हे विद्यार्थी एटीकेटी सवलतीद्वारे ११ वी प्रवेशाला पात्र ठरतात. गुणपडताळणी करण्यासाठी २४ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे, असे पुन्ने यांनी सांगितले. यावेळी बोर्डाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

---

अकरावी प्रवेशप्रक्रियेत घेता येईल सहभाग

---

अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला उशीर झाला आहे. तसेच हा निकाल लवकर लागला. त्यामुळे सध्या विशेष फेरी सुरू असून पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले दहावीचे विद्यार्थी अकरावी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होऊ शकतील असे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण म्हणाले. तर उपशिक्षणाधिकारी अनिल साबळे यांनी यासाठी स्वतंत्र फेरीच्या सूचना शासनाकडून मिळतील असे सांगितले.

---