शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ८८.१५ टक्के

By admin | Updated: June 13, 2017 15:54 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल आज

ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 13  - माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. यंदा विभागीय मंडळाचा ८८.१५ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात (अवघी ००.१० टक्के) किरकोळ वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता विभागीय मंडळाचे अध्यक्ष शिशीर घनमोडे आणि विभागीय सचिव वंदना वाहुळ यांनी दहावीचा निकाल जाहीर केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिशीर घनमोडे यांनी दहावीच्या निकालावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली. यंदा ७ मार्च ते १ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली. या विभागातील औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८३ हजार २३९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ६१ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांचे हे प्रमाण ८८.१५ टक्के एवढे आहे. यंदाही दहावीच्या परीक्षेत बीड जिल्हाच अव्वल ठरला आहे. या जिल्ह्याचा निकाल ९२.६५ टक्के एवढा असून, दुसऱ्या क्रमांकावर जालना (८९.९० टक्के), तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद (८९.५६ टक्के), चौथ्या क्रमांकावर हिंगोली (८०.९३ टक्के), तर निकालामध्ये सर्वात मागे परभणी जिल्हा (८०.८९ टक्के) राहिला आहे. औरंगाबाद विभागात दहावी परीक्षेत याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. या वर्षी विभागात १ लाख ६ हजार ६२३ मुले, तर ७६ हजार ६१६ मुलांनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी ९१ हजार २५८ मुले आणि ७० हजार २६८ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.५९ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९१.७१ टक्के एवढे आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ६.११ टक्क्यांनी अधिक आहे. समाधानकारक प्रगती नाहीमागील पाच वर्षांचा दहावीच्या निकालाचा विभागाचा गोषवारा तपासला तर विभागाच्या निकालात समाधानकारक प्रगती झाल्याचे दिसत नाही. सन २०१३ मध्ये औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ८१.१८ टक्के, सन २०१४ मध्ये ८७.०६ टक्के, सन २०१५ मध्ये ९०.५७ टक्के, सन २०१६ मध्ये ८८.०५ टक्के आणि यंदा ८८.१५ टक्के एवढा निकाल लागलेला आहे. सलग दोन- तीन वर्षांपासून बीड जिल्"ाने निकालाची आघाडी कायम राखली आहे, तर औरंगाबाद जिल्हा हा सतत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.