शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ८८.१५ टक्के

By admin | Updated: June 13, 2017 15:54 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल आज

ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 13  - माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. यंदा विभागीय मंडळाचा ८८.१५ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात (अवघी ००.१० टक्के) किरकोळ वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता विभागीय मंडळाचे अध्यक्ष शिशीर घनमोडे आणि विभागीय सचिव वंदना वाहुळ यांनी दहावीचा निकाल जाहीर केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिशीर घनमोडे यांनी दहावीच्या निकालावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली. यंदा ७ मार्च ते १ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली. या विभागातील औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८३ हजार २३९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ६१ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांचे हे प्रमाण ८८.१५ टक्के एवढे आहे. यंदाही दहावीच्या परीक्षेत बीड जिल्हाच अव्वल ठरला आहे. या जिल्ह्याचा निकाल ९२.६५ टक्के एवढा असून, दुसऱ्या क्रमांकावर जालना (८९.९० टक्के), तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद (८९.५६ टक्के), चौथ्या क्रमांकावर हिंगोली (८०.९३ टक्के), तर निकालामध्ये सर्वात मागे परभणी जिल्हा (८०.८९ टक्के) राहिला आहे. औरंगाबाद विभागात दहावी परीक्षेत याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. या वर्षी विभागात १ लाख ६ हजार ६२३ मुले, तर ७६ हजार ६१६ मुलांनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी ९१ हजार २५८ मुले आणि ७० हजार २६८ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.५९ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९१.७१ टक्के एवढे आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ६.११ टक्क्यांनी अधिक आहे. समाधानकारक प्रगती नाहीमागील पाच वर्षांचा दहावीच्या निकालाचा विभागाचा गोषवारा तपासला तर विभागाच्या निकालात समाधानकारक प्रगती झाल्याचे दिसत नाही. सन २०१३ मध्ये औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ८१.१८ टक्के, सन २०१४ मध्ये ८७.०६ टक्के, सन २०१५ मध्ये ९०.५७ टक्के, सन २०१६ मध्ये ८८.०५ टक्के आणि यंदा ८८.१५ टक्के एवढा निकाल लागलेला आहे. सलग दोन- तीन वर्षांपासून बीड जिल्"ाने निकालाची आघाडी कायम राखली आहे, तर औरंगाबाद जिल्हा हा सतत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.