शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात साडेतीन हजार सिंचन विहिरी अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:22 IST

एकीकडे शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी शासनाने मागेल त्याला सिंचन विहीर ही योजना अमलात आणली आहे, तर दुसरीकडे औरंगाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सिंचन विहिरींसाठी निधीच दिलेला नाही. त्यामुळे मंजूर ६ हजार ९८५ विहिरींपैकी ३ हजार ५३८ विहिरी अर्धवट अवस्थेत पडून आहेत.

ठळक मुद्देउदासीनता : ७५ कोटींचा निधी अडवला; मराठवाड्यातील शेतक-यांची चेष्टा थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एकीकडे शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी शासनाने मागेल त्याला सिंचन विहीर ही योजना अमलात आणली आहे, तर दुसरीकडे औरंगाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सिंचन विहिरींसाठी निधीच दिलेला नाही. त्यामुळे मंजूर ६ हजार ९८५ विहिरींपैकी ३ हजार ५३८ विहिरी अर्धवट अवस्थेत पडून आहेत.साधारणपणे सन २००८ पासून धडक सिंचन विहीर ही योजना अमलात आली. गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत सदरील विहिरी पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात ६ हजार ९८५ विहिरींना मंजुरी मिळाली. मात्र, अलीकडच्या काळात शासनाने निधीसाठी हात आखडता घेतल्यामुळे शेतकºयांना विहिरींचे काम पूर्णत्वाकडे नेता आले नाही. सिंचन विहिरींसाठी अकुशल आणि कुशल कामांची वर्गवारी करण्यात आली. मंजूर विहिरींच्या अकुशल कामांसाठी आतापर्यंत २४ कोटी ६३ लाख ५५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला, तर कुशल कामांसाठी ६ कोटी ४ लाख ८७ हजार रुपयांचा निधी मिळाला. अकुशल कामांसाठी शासनाकडून ३९ कोटी ४ लाख ४५ हजार रुपये व कुशल कामांसाठी ३५ कोटी ९८ लाख रुपये, असा एकूण साधारणपणे ७५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त न झाल्यामुळे साडेतीन हजार विहिरी अर्धवट अवस्थेत पडून आहेत. दुसरीकडे शासनाने नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांसाठी धडक कार्यक्रम घेण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला आहे.मराठवाड्यावरच अन्याय कशासाठीजि.प.स्थायी समिती सदस्य किशोर बलांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की, शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना समान न्यायाची भूमिका घ्यायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या जिल्ह्यासाठी सिंचन विहिरींबाबत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विहिरी जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुभा दिली आहे, दुसरीकडे दुष्काळग्रस्त औरंगाबाद जिल्ह्यासाठी मात्र सापत्न भूमिका घेतली आहे. मागील काही वर्षांपासून या जिल्ह्यातील सिंचन विहिरींसाठी आवश्यक जवळपास ७५ कोटी रुपयांचा निधी अडवण्यात आला आहे. मराठवाड्यावर अन्याय करून शासन काय साध्य करणार आहे.