शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

औरंगाबाद जिल्ह्यात साडेतीन हजार सिंचन विहिरी अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:22 IST

एकीकडे शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी शासनाने मागेल त्याला सिंचन विहीर ही योजना अमलात आणली आहे, तर दुसरीकडे औरंगाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सिंचन विहिरींसाठी निधीच दिलेला नाही. त्यामुळे मंजूर ६ हजार ९८५ विहिरींपैकी ३ हजार ५३८ विहिरी अर्धवट अवस्थेत पडून आहेत.

ठळक मुद्देउदासीनता : ७५ कोटींचा निधी अडवला; मराठवाड्यातील शेतक-यांची चेष्टा थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एकीकडे शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी शासनाने मागेल त्याला सिंचन विहीर ही योजना अमलात आणली आहे, तर दुसरीकडे औरंगाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सिंचन विहिरींसाठी निधीच दिलेला नाही. त्यामुळे मंजूर ६ हजार ९८५ विहिरींपैकी ३ हजार ५३८ विहिरी अर्धवट अवस्थेत पडून आहेत.साधारणपणे सन २००८ पासून धडक सिंचन विहीर ही योजना अमलात आली. गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत सदरील विहिरी पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात ६ हजार ९८५ विहिरींना मंजुरी मिळाली. मात्र, अलीकडच्या काळात शासनाने निधीसाठी हात आखडता घेतल्यामुळे शेतकºयांना विहिरींचे काम पूर्णत्वाकडे नेता आले नाही. सिंचन विहिरींसाठी अकुशल आणि कुशल कामांची वर्गवारी करण्यात आली. मंजूर विहिरींच्या अकुशल कामांसाठी आतापर्यंत २४ कोटी ६३ लाख ५५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला, तर कुशल कामांसाठी ६ कोटी ४ लाख ८७ हजार रुपयांचा निधी मिळाला. अकुशल कामांसाठी शासनाकडून ३९ कोटी ४ लाख ४५ हजार रुपये व कुशल कामांसाठी ३५ कोटी ९८ लाख रुपये, असा एकूण साधारणपणे ७५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त न झाल्यामुळे साडेतीन हजार विहिरी अर्धवट अवस्थेत पडून आहेत. दुसरीकडे शासनाने नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांसाठी धडक कार्यक्रम घेण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला आहे.मराठवाड्यावरच अन्याय कशासाठीजि.प.स्थायी समिती सदस्य किशोर बलांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की, शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना समान न्यायाची भूमिका घ्यायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या जिल्ह्यासाठी सिंचन विहिरींबाबत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विहिरी जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुभा दिली आहे, दुसरीकडे दुष्काळग्रस्त औरंगाबाद जिल्ह्यासाठी मात्र सापत्न भूमिका घेतली आहे. मागील काही वर्षांपासून या जिल्ह्यातील सिंचन विहिरींसाठी आवश्यक जवळपास ७५ कोटी रुपयांचा निधी अडवण्यात आला आहे. मराठवाड्यावर अन्याय करून शासन काय साध्य करणार आहे.