शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ६३ टक्के मतदान

By | Updated: December 3, 2020 04:10 IST

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील सर्वाधिक मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात १ लाख ६ हजार ३७९ मतदारांपैकी ६७ हजार ...

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील सर्वाधिक मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात १ लाख ६ हजार ३७९ मतदारांपैकी ६७ हजार ७४ पदवीधरांनी म्हणजे ६३.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ पैकी २ तृतीयपंथीय मतदारांनी मतदान केले. ग्रामीण भागातील ७० टक्के मतदानाचा अंदाज आहे.

सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या एका तासात मतदानाचा जोर वाढला. सकाळच्या सत्रात ९.२७ टक्केच मतदान झाले. दुपारच्या सत्रात २०.४८ टक्के मतदान झाले. दुपारी १२ ते २ यावेळेत ३६.९१ टक्के मतदान झाले. २ ते ४ वाजेपर्यंंत ५१.९८ टक्के मतदानाची नोंद झाली. ४ ते ५ या शेवटच्या तासात ६३ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले.

३१ हजार ४१५ महिला मतदारांपैकी १६ हजार ९०७ महिला पदवीधरांनी मतदान केले. ७४ हजार ९५१ पुरूष पदवीधरांपैकी ५० हजार १६५ जणांनी मतदान केले. शेवटच्या तासात १२ टक्के मतदान झाले.

प्रमुख उमेदवारांचा दावा...

भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढली असून त्याचा अर्थ परिवर्तन आहे, असे मी मानतो. विजयाच्या दिशेने भाजपा गेल्याचा दावा त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी सांगितले, पहिल्या फेरीतच आमचा विजय होईल. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पुढे येण्याची संधी देखील मिळणार नाही.