शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

नाशिककडून औरंगाबाद ५५ धावांनी पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:54 IST

फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे औरंगाबादला शनिवारी पुणे येथे एमसीएतर्फे सुरू असलेल्या सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत नाशिककडून ५५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ८८ धावांत एकूण १२ बळी घेणारा सत्यजित बच्छाव हा नाशिकच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

औरंगाबाद : फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे औरंगाबादला शनिवारी पुणे येथे एमसीएतर्फे सुरू असलेल्या सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत नाशिककडून ५५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ८८ धावांत एकूण १२ बळी घेणारा सत्यजित बच्छाव हा नाशिकच्या विजयाचा शिल्पकार ठरला.औरंगाबादने प्रथम फलंदाजी करणाऱ्या नाशिकचा पहिला डाव १५३ धावांत रोखला. नाशिककडून जयेश अहिरेने ४२ व श्रीकांत शेरीकरने ३६ धावा केल्या औरंगाबादकडून प्रवीण क्षीरसागर व शुभम चाटे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तथापि, गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फेरल्याने औरंगाबादचा पहिला डाव ७४ धावांत संपुष्टात आला. औरंगाबादकडून मधुर पटेलने ३१ व स्वप्नील चव्हाणने २१ धावा केल्या. नाशिककडून सत्यजित बच्छाव व गौरव काळे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. पहिल्या डावात ७९ धावांची आघाडी घेणाºया नाशिकने त्यांचा दुसरा डाव ८ बाद १८५ धावांवर घोषित करून औरंगाबादसमोर २६५ धावांचे विजयासाठी लक्ष्य ठेवले. नाशिककडून दुसºया डावात जयेश अहिरेने ८९ व प्रतीक आठवले याने ५३ धावा केल्या. औरंगाबादकडून संदीप सहानीने ३ व राहुल शर्माने २ गडी बाद केले. २६५ धावांचे विजयाचे लक्ष्य घेऊन खेळणाºया औरंगाबादचा दुसरा डाव २0९ धावांत आटोपला. औरंगाबादकडून मधुर पटेलने ५९, नितीन फुलाने याने ५४, सूरज सुलाने याने २९ व प्रज्ज्वल घोडकेने २८ धावा केल्या नाशिककडून सत्यजित बच्छावने ६५ धावांत ८ गडी बाद केले. त्याला गौरव काळेने २ गडी बाद करीत साथ दिली.