शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात ४000 मे. टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:11 IST

कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही. आता कचºयाचा प्रश्न न्यायालयात गेला असल्याने महापालिका आणखी निवांत झाली आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे शहरातील १५ लाख नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. मागील १३ दिवसांमध्ये ४ हजार मेट्रिक टन जमा झाला. यातील दोनशे ते चारशे मेट्रिक टन कचरा मनपाने उचलला. शहरातील विविध वॉर्डांमध्ये खड्डे खोदून हा कचरा निव्वळ पुरण्यात आला. ही शास्त्रोक्त पद्धत नसल्याची ओरड नागरिकांमधून होऊ लागली. त्यामुळे मनपाने ही प्रक्रिया थांबविली. शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने साथी शहरात दाखल झाले होते. त्यातील लाखो साथी औरंगाबाद शहरात आपल्या नातेवाईकांकडे थांबले आहेत. त्यांनाही शहरातील हे बकाल चित्र पाहून आश्चर्य वाटत आहे. शहरात महापालिका आहे किंवा नाही, असा प्रश्न येणाºया पाहुण्यांना पडला आहे.शहरात साचलेल्या कचºयावर बायोट्रिट पावडर टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोगही अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. दोन लाख नागरिकांना मास्क वाटपचा निर्णय घेण्यात आला. हे मास्क कधी आणि कोणाला वाटले हे सुद्धा मनपा सांगू शकत नाही. कचºयावर तोडगा काढण्याचे सोडून दुसरेच उद्योग महापालिका प्रशासनाकडून सुरू आहेत.आंदोलन चालूच राहणारऔरंगाबाद : नारेगाव-मांडकी येथील कचरा डेपोत कचरा आणून टाकण्यास विरोध करणारे १४ गावांतील ग्रामस्थांनी सुरू केलेले साखळी उपोषण आंदोलन सुटण्याची चिन्हे नाहीत. कचराकोंडी फुटण्यास काही मार्ग सापडत नसून आंदोलकांचा ११ व्या दिवशीही ठिय्या कायम होता.नारेगाव, मांडकी, कच्चीघाटी, गोपाळपूर, पिसादेवी, महालपिंप्री, रामपूर, वरूड, सुलतानपूर, पीरवाडी, चिकलठाणा, पळशी व अन्य दोन गावांतील ग्रामस्थांनी कचरा डेपो हटावच्या मागणीसाठी पालिकेच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आबालवृद्धांसह महिलादेखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे शहरात बहुतांश दुभाजकांवर कचºयाचे ढीग साचले आहेत.मंगळवारी आंदोलकांनी भूमिका विशद करताना सांगितले, मागील ३० ते ३२ वर्षांपासून हा कचरा डेपो येथे आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नापिकी, श्वसनाचे आजार, दम्याचे आजार होत आहेत. ‘करेंगे या मरेंगे’ या भूमिकेने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे, असे पुंडलिक अंभोरे, सुनील हरणे, ज्ञानेश्वर सोनवणे, बबनराव वडेकर, अमोल काकडे, मनोज गायके, रवी गायके, भाऊसाहेब गायके, गणेश गायके, बापू गायके, अशोक कुबेर, बद्री अंभोरे, किशोर गायके, बंडू गायके, संजय डक, अहमद शहा, अकबरभाई, रियाज शहा, जगन वडेकर, लालाभाई यांनी सांगितले. नगरसेवक गोकुळ मलके यांच्यावर आंदोलक व नागरिकांनी टीकाकेली. वॉर्डातील कचरा डेपोत न आणता प्रक्रिया करीत असल्याचा नगरसेवक मलके यांचा दावा नागरिकांनी फेटाळला.माशांचा सर्वाधिक धोकाकचºयावर घोंगावणाºया माशा शहरातील १५ लाख नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते कचºयावरील माशा खाद्यपदार्थांवर जाऊन बसल्या, तर निश्चित रोगराई पसरू शकते.मागील काही दिवसांपासून प्रत्येक वसाहतीत कचºयाचे डोंगर साचले आहेत. आता या कचºयातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, परिसरात राहणाºया नागरिकांना अक्षरश: मरणयातनाच सहन कराव्या लागत आहेत.