शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात ४000 मे. टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:11 IST

कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही. आता कचºयाचा प्रश्न न्यायालयात गेला असल्याने महापालिका आणखी निवांत झाली आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे शहरातील १५ लाख नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. मागील १३ दिवसांमध्ये ४ हजार मेट्रिक टन जमा झाला. यातील दोनशे ते चारशे मेट्रिक टन कचरा मनपाने उचलला. शहरातील विविध वॉर्डांमध्ये खड्डे खोदून हा कचरा निव्वळ पुरण्यात आला. ही शास्त्रोक्त पद्धत नसल्याची ओरड नागरिकांमधून होऊ लागली. त्यामुळे मनपाने ही प्रक्रिया थांबविली. शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने साथी शहरात दाखल झाले होते. त्यातील लाखो साथी औरंगाबाद शहरात आपल्या नातेवाईकांकडे थांबले आहेत. त्यांनाही शहरातील हे बकाल चित्र पाहून आश्चर्य वाटत आहे. शहरात महापालिका आहे किंवा नाही, असा प्रश्न येणाºया पाहुण्यांना पडला आहे.शहरात साचलेल्या कचºयावर बायोट्रिट पावडर टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोगही अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. दोन लाख नागरिकांना मास्क वाटपचा निर्णय घेण्यात आला. हे मास्क कधी आणि कोणाला वाटले हे सुद्धा मनपा सांगू शकत नाही. कचºयावर तोडगा काढण्याचे सोडून दुसरेच उद्योग महापालिका प्रशासनाकडून सुरू आहेत.आंदोलन चालूच राहणारऔरंगाबाद : नारेगाव-मांडकी येथील कचरा डेपोत कचरा आणून टाकण्यास विरोध करणारे १४ गावांतील ग्रामस्थांनी सुरू केलेले साखळी उपोषण आंदोलन सुटण्याची चिन्हे नाहीत. कचराकोंडी फुटण्यास काही मार्ग सापडत नसून आंदोलकांचा ११ व्या दिवशीही ठिय्या कायम होता.नारेगाव, मांडकी, कच्चीघाटी, गोपाळपूर, पिसादेवी, महालपिंप्री, रामपूर, वरूड, सुलतानपूर, पीरवाडी, चिकलठाणा, पळशी व अन्य दोन गावांतील ग्रामस्थांनी कचरा डेपो हटावच्या मागणीसाठी पालिकेच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आबालवृद्धांसह महिलादेखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे शहरात बहुतांश दुभाजकांवर कचºयाचे ढीग साचले आहेत.मंगळवारी आंदोलकांनी भूमिका विशद करताना सांगितले, मागील ३० ते ३२ वर्षांपासून हा कचरा डेपो येथे आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नापिकी, श्वसनाचे आजार, दम्याचे आजार होत आहेत. ‘करेंगे या मरेंगे’ या भूमिकेने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे, असे पुंडलिक अंभोरे, सुनील हरणे, ज्ञानेश्वर सोनवणे, बबनराव वडेकर, अमोल काकडे, मनोज गायके, रवी गायके, भाऊसाहेब गायके, गणेश गायके, बापू गायके, अशोक कुबेर, बद्री अंभोरे, किशोर गायके, बंडू गायके, संजय डक, अहमद शहा, अकबरभाई, रियाज शहा, जगन वडेकर, लालाभाई यांनी सांगितले. नगरसेवक गोकुळ मलके यांच्यावर आंदोलक व नागरिकांनी टीकाकेली. वॉर्डातील कचरा डेपोत न आणता प्रक्रिया करीत असल्याचा नगरसेवक मलके यांचा दावा नागरिकांनी फेटाळला.माशांचा सर्वाधिक धोकाकचºयावर घोंगावणाºया माशा शहरातील १५ लाख नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते कचºयावरील माशा खाद्यपदार्थांवर जाऊन बसल्या, तर निश्चित रोगराई पसरू शकते.मागील काही दिवसांपासून प्रत्येक वसाहतीत कचºयाचे डोंगर साचले आहेत. आता या कचºयातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, परिसरात राहणाºया नागरिकांना अक्षरश: मरणयातनाच सहन कराव्या लागत आहेत.