शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

औरंगाबाद शहरात ४000 मे. टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:11 IST

कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही. आता कचºयाचा प्रश्न न्यायालयात गेला असल्याने महापालिका आणखी निवांत झाली आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे शहरातील १५ लाख नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. मागील १३ दिवसांमध्ये ४ हजार मेट्रिक टन जमा झाला. यातील दोनशे ते चारशे मेट्रिक टन कचरा मनपाने उचलला. शहरातील विविध वॉर्डांमध्ये खड्डे खोदून हा कचरा निव्वळ पुरण्यात आला. ही शास्त्रोक्त पद्धत नसल्याची ओरड नागरिकांमधून होऊ लागली. त्यामुळे मनपाने ही प्रक्रिया थांबविली. शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने साथी शहरात दाखल झाले होते. त्यातील लाखो साथी औरंगाबाद शहरात आपल्या नातेवाईकांकडे थांबले आहेत. त्यांनाही शहरातील हे बकाल चित्र पाहून आश्चर्य वाटत आहे. शहरात महापालिका आहे किंवा नाही, असा प्रश्न येणाºया पाहुण्यांना पडला आहे.शहरात साचलेल्या कचºयावर बायोट्रिट पावडर टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोगही अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. दोन लाख नागरिकांना मास्क वाटपचा निर्णय घेण्यात आला. हे मास्क कधी आणि कोणाला वाटले हे सुद्धा मनपा सांगू शकत नाही. कचºयावर तोडगा काढण्याचे सोडून दुसरेच उद्योग महापालिका प्रशासनाकडून सुरू आहेत.आंदोलन चालूच राहणारऔरंगाबाद : नारेगाव-मांडकी येथील कचरा डेपोत कचरा आणून टाकण्यास विरोध करणारे १४ गावांतील ग्रामस्थांनी सुरू केलेले साखळी उपोषण आंदोलन सुटण्याची चिन्हे नाहीत. कचराकोंडी फुटण्यास काही मार्ग सापडत नसून आंदोलकांचा ११ व्या दिवशीही ठिय्या कायम होता.नारेगाव, मांडकी, कच्चीघाटी, गोपाळपूर, पिसादेवी, महालपिंप्री, रामपूर, वरूड, सुलतानपूर, पीरवाडी, चिकलठाणा, पळशी व अन्य दोन गावांतील ग्रामस्थांनी कचरा डेपो हटावच्या मागणीसाठी पालिकेच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आबालवृद्धांसह महिलादेखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे शहरात बहुतांश दुभाजकांवर कचºयाचे ढीग साचले आहेत.मंगळवारी आंदोलकांनी भूमिका विशद करताना सांगितले, मागील ३० ते ३२ वर्षांपासून हा कचरा डेपो येथे आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नापिकी, श्वसनाचे आजार, दम्याचे आजार होत आहेत. ‘करेंगे या मरेंगे’ या भूमिकेने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे, असे पुंडलिक अंभोरे, सुनील हरणे, ज्ञानेश्वर सोनवणे, बबनराव वडेकर, अमोल काकडे, मनोज गायके, रवी गायके, भाऊसाहेब गायके, गणेश गायके, बापू गायके, अशोक कुबेर, बद्री अंभोरे, किशोर गायके, बंडू गायके, संजय डक, अहमद शहा, अकबरभाई, रियाज शहा, जगन वडेकर, लालाभाई यांनी सांगितले. नगरसेवक गोकुळ मलके यांच्यावर आंदोलक व नागरिकांनी टीकाकेली. वॉर्डातील कचरा डेपोत न आणता प्रक्रिया करीत असल्याचा नगरसेवक मलके यांचा दावा नागरिकांनी फेटाळला.माशांचा सर्वाधिक धोकाकचºयावर घोंगावणाºया माशा शहरातील १५ लाख नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते कचºयावरील माशा खाद्यपदार्थांवर जाऊन बसल्या, तर निश्चित रोगराई पसरू शकते.मागील काही दिवसांपासून प्रत्येक वसाहतीत कचºयाचे डोंगर साचले आहेत. आता या कचºयातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, परिसरात राहणाºया नागरिकांना अक्षरश: मरणयातनाच सहन कराव्या लागत आहेत.