शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

औरंगाबाद शहरात ४000 मे. टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:11 IST

कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराकोंडीमुळे शहरातील प्रत्येक वसाहतीत दुर्गंधी सुटली आहे. कोणत्याही क्षणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेने सर्व प्रयत्न केल्यानंतरही मागील १३ दिवसांमध्ये कचराकोंडी फोडण्यात यश आलेले नाही. आता कचºयाचा प्रश्न न्यायालयात गेला असल्याने महापालिका आणखी निवांत झाली आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे शहरातील १५ लाख नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. मागील १३ दिवसांमध्ये ४ हजार मेट्रिक टन जमा झाला. यातील दोनशे ते चारशे मेट्रिक टन कचरा मनपाने उचलला. शहरातील विविध वॉर्डांमध्ये खड्डे खोदून हा कचरा निव्वळ पुरण्यात आला. ही शास्त्रोक्त पद्धत नसल्याची ओरड नागरिकांमधून होऊ लागली. त्यामुळे मनपाने ही प्रक्रिया थांबविली. शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने साथी शहरात दाखल झाले होते. त्यातील लाखो साथी औरंगाबाद शहरात आपल्या नातेवाईकांकडे थांबले आहेत. त्यांनाही शहरातील हे बकाल चित्र पाहून आश्चर्य वाटत आहे. शहरात महापालिका आहे किंवा नाही, असा प्रश्न येणाºया पाहुण्यांना पडला आहे.शहरात साचलेल्या कचºयावर बायोट्रिट पावडर टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोगही अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. दोन लाख नागरिकांना मास्क वाटपचा निर्णय घेण्यात आला. हे मास्क कधी आणि कोणाला वाटले हे सुद्धा मनपा सांगू शकत नाही. कचºयावर तोडगा काढण्याचे सोडून दुसरेच उद्योग महापालिका प्रशासनाकडून सुरू आहेत.आंदोलन चालूच राहणारऔरंगाबाद : नारेगाव-मांडकी येथील कचरा डेपोत कचरा आणून टाकण्यास विरोध करणारे १४ गावांतील ग्रामस्थांनी सुरू केलेले साखळी उपोषण आंदोलन सुटण्याची चिन्हे नाहीत. कचराकोंडी फुटण्यास काही मार्ग सापडत नसून आंदोलकांचा ११ व्या दिवशीही ठिय्या कायम होता.नारेगाव, मांडकी, कच्चीघाटी, गोपाळपूर, पिसादेवी, महालपिंप्री, रामपूर, वरूड, सुलतानपूर, पीरवाडी, चिकलठाणा, पळशी व अन्य दोन गावांतील ग्रामस्थांनी कचरा डेपो हटावच्या मागणीसाठी पालिकेच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आबालवृद्धांसह महिलादेखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे शहरात बहुतांश दुभाजकांवर कचºयाचे ढीग साचले आहेत.मंगळवारी आंदोलकांनी भूमिका विशद करताना सांगितले, मागील ३० ते ३२ वर्षांपासून हा कचरा डेपो येथे आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नापिकी, श्वसनाचे आजार, दम्याचे आजार होत आहेत. ‘करेंगे या मरेंगे’ या भूमिकेने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे, असे पुंडलिक अंभोरे, सुनील हरणे, ज्ञानेश्वर सोनवणे, बबनराव वडेकर, अमोल काकडे, मनोज गायके, रवी गायके, भाऊसाहेब गायके, गणेश गायके, बापू गायके, अशोक कुबेर, बद्री अंभोरे, किशोर गायके, बंडू गायके, संजय डक, अहमद शहा, अकबरभाई, रियाज शहा, जगन वडेकर, लालाभाई यांनी सांगितले. नगरसेवक गोकुळ मलके यांच्यावर आंदोलक व नागरिकांनी टीकाकेली. वॉर्डातील कचरा डेपोत न आणता प्रक्रिया करीत असल्याचा नगरसेवक मलके यांचा दावा नागरिकांनी फेटाळला.माशांचा सर्वाधिक धोकाकचºयावर घोंगावणाºया माशा शहरातील १५ लाख नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते कचºयावरील माशा खाद्यपदार्थांवर जाऊन बसल्या, तर निश्चित रोगराई पसरू शकते.मागील काही दिवसांपासून प्रत्येक वसाहतीत कचºयाचे डोंगर साचले आहेत. आता या कचºयातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, परिसरात राहणाºया नागरिकांना अक्षरश: मरणयातनाच सहन कराव्या लागत आहेत.