शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

चार कृषी विद्यापीठांतील सहयोगी प्राध्यापकांकडून १०० कोटी वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश

By प्रभुदास पाटोळे | Updated: October 20, 2023 19:31 IST

उच्च न्यायालयाचा निर्णय; अपिलासाठी ३ आठवड्यांची मुदत

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील चार कृषी विद्यापीठांतील सहयोगी प्राध्यापकांकडून अतिप्रदान १०० कोटी रुपये वसूल करा, अशा आशयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. शैलेश ब्रह्मे यांनी शासनास दिला आहे. खंडपीठाने याचिकांवरील निकाल ११ ऑगस्ट २०२३ रोजी राखून ठेवला होता. तो १८ ऑक्टोबर २०२३ रोजी घोषित केला.

अतिप्रदान रकमेच्या नोटिसांना आव्हान देणाऱ्या प्राध्यापकांच्या याचिका खंडपीठाने फेटाळल्या. सेवेत असलेल्यांना भविष्यात मिळणाऱ्या रकमेतून अतिप्रदान रक्कम वसूल करावी. निवृत्त झालेल्यांनी महाविद्यालय अथवा विद्यापीठामार्फत शासनाकडे अर्ज करावेत. शासनाने प्रत्येक अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्यावा, असे आदेशात म्हटले आहे. खंडपीठाने यापूर्वी दिलेला अंतरिम स्थगिती आदेश अद्याप अंमलात आहे. म्हणून वसुली आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मिळावा यासाठी स्थगिती आदेशाचा वेळ वाढवून देण्याची विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली. त्यावर खंडपीठाने या आदेशाला तीन आठवड्यांपर्यंत स्थगिती दिली.

याचिकाकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने पगारधोरण (पे स्केल) लागू केले गेले होते. त्यांना अदा केलेली जादा रक्कम परत करावी यासाठी विद्यापीठांनी वसुलीच्या नोटिसा जारी केल्या. त्याविरुद्ध प्राध्यापकांनी खंडपीठात याचिका दाखल केल्या. खंडपीठाने नोटिसांना २०१८ मध्ये अंतरिम स्थगिती दिली, ती अद्याप अंमलात आहे.

शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अनिल अंतूरकर आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता प्रवीण पाटील यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्य शासनाने पगार धोरण लागू केले होते. त्यानुसार १८ मार्च २०१० ला शासन निर्णय जारी केला होता. मात्र, काही अधिकाऱ्यांनी १८ मार्चच्या शासन निर्णयात ‘दुरुस्ती’ (कोरिजेन्डम) करुन २० सप्टेंबर २०१० ला सुधारित शासन निर्णय जारी केला होता. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी वित्त विभागाची आणि मंत्रिमंडळाची परवानगी न घेता, परस्पर निर्णय घेतला होता. जो चूक होता. नंतर शासनाने ही दुरुस्ती मागे घेतली. मात्र, तत्पूर्वी २० सप्टेंबर २०१० च्या चुकीच्या शासन निर्णयामुळे प्राध्यापकांना जादा रक्कम अदा केली गेली. ती वसूल करण्याचा शासनाचा निर्णय बरोबर आहे. विशेष म्हणजे शासनाने चुकून जादा रक्कम दिली असेल तर ती परत करू, अशी लेखी हमी संबंधित प्राध्यापकांनी दिली होती, याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. शासनाने चुकून जादा रक्कम दिली नाही, तर १८ मार्च २०१० च्या शासन निर्णयानुसार वेतन दिले असून, ते बरोबर आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबाद