शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

औरंगाबादेत ६ दिवसांत वाढले ४४० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज ३० ते ४० झाल्याने एकूण सक्रिय रुग्णसंख्या आटोक्यात येत २८ जानेवारीला ९१ झाली ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज ३० ते ४० झाल्याने एकूण सक्रिय रुग्णसंख्या आटोक्यात येत २८ जानेवारीला ९१ झाली होती. मात्र, गेल्या पंधरवड्यात सक्रिय रुग्णसंख्येची वाटचाल पुन्हा तिहेरी आकड्याने सुरू असून ५० पेक्षा अधिकने दररोज रुग्ण वाढत आहे. गेल्या ६ दिवसांत ४४० रुग्णांची भर पडली. ४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सक्रिय रुग्णांची संख्या ४०७ वर पोहचली आहे.

पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालयांत पदवीचे प्रत्यक्ष वर्ग भरायला सुरुवात झाली. शाळांमध्ये नियमांचे काहीसे पालन होत आहे. मात्र, महाविद्यालये, विविध कार्यक्रम, पक्षांचे मेळावे, संगीत, पुस्तक प्रकाशन सोहळे, लग्नसमारंभ, बाजारपेठांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. विभागीय वार्षिक योजनेच्या बैठकीनिमित्त शहरात आलेल्या मंत्री, नेत्यांच्या उपस्थितीत अनेक राजकीय बैठका, कार्यक्रम पार पडले. मनपाकडून दररोज दंडात्मक कारवाई केली जात असतांना नाका तोंडावरचा मास्क केवळ हनुवटीवर लावून फिरणारे, घोळक्यातील रंगलेले गप्पांचे फड ठिकठिकाणी दिसताहेत. दुसरीकडे जिल्ह्यात सुरू कोरोना लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

---

दिनांक : बाधित रुग्ण

--

११ फेब्रुवारी -६६

१२ फेब्रुवारी -७१

१३ फेब्रुवारी-५८

१४ फेब्रुवारी -५८

१५ फेब्रुवारी -७७

१६ फेब्रुवारी -१२०