शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

औरंगाबादमध्ये ३ दिवस पाण्याचे वांधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:58 IST

गुरुवारी वीज वितरण कंपनीने महापालिकेच्या जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्राची पाच तास वीज कपात केली होती. यातून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत येत असतानाच शनिवारी रात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली १४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तब्बल सहा तास शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यामुळे रविवार ते मंगळवारपर्यंत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

ठळक मुद्देजलवाहिनी फुटली : पाणीपुरवठ्यात दररोज नवीन विघ्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गुरुवारी वीज वितरण कंपनीने महापालिकेच्या जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्राची पाच तास वीज कपात केली होती. यातून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत येत असतानाच शनिवारी रात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली १४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तब्बल सहा तास शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यामुळे रविवार ते मंगळवारपर्यंत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शहरातील पाणीपुरवठ्यात दररोज नवीन नवीन विघ्न येत आहे. त्यामुळे औरंगाबादकरांवर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंतीची वेळ येत आहे. गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी वीज कंपनीने थकबाकीसाठी जायकवाडी येथील वीजपुरवठा खंडित केला. शहराचा पाणीपुरवठा बंद होताच महापालिकेने तातडीने साडेतीन कोटी रुपयांचा भरणा केला. त्यानंतर सायंकाळी वीज कंपनीने विजेचा पुरवठा सुरळीत केला होता. पाच तास पाण्याचा उपसा बंद असल्याने सिडको-हडकोसह शहरातही पाण्यासाठी ओरड सुरू झाली होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कसेबसे प्रयत्न करून शुक्रवारी आणि शनिवारी नागरिकांची तहान भागविली. शनिवारी रात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ १४०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. १०० फूट कारंजे उडू लागले. तशाच अवस्थेत पाणीपुरवठा सुरू ठेवून शनिवारी पाळी असलेल्या वसाहतींना पाणी देण्यात आले. दुपारी पुरवठा बंद करून दुरुस्ती करण्यात आली. सायंकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. शनिवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, त्या वसाहतींना रविवारी पाणी देण्यात येईल. एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपअभियंता के. एम. फालक यांनी दिली.सिडको-हडकोतही पाण्याची ओरडसिडको एन-५ आणि एन-७ येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये जायकवाडीहून अत्यंत कमी पाणी येत आहे. त्यामुळे सिडको-हडकोतील अनेक वसाहतींना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा मागील काही दिवसांपासून होत आहे.यासंदर्भात नगरसेवकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही पाणीपुरवठ्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.साताºयातील जलवाहिनी दुरुस्त होईनामुख्य जलवाहिनी फुटल्याने सातारा गावातील चाळीस गल्ल्यांचा पाणीपुरवठा एक महिन्यापासून खंडित झाला आहे. सातारा ते श्रेयस कॉलेज रोडच्या मध्यभागी ही जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून डोक्यावर किंवा सायकलीवर रोज पाणी आणावे लागते.रोड तयार करण्यापूर्वी येथे नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी नागरिकांनी अधिकाºयांकडे केली होती. सर्व्हे करून अधिकारी निघून गेले ते वर्षभर आलेच नाही. त्यावर सिमेंटचा पक्का रस्ता तयार करण्यात आला. त्याखाली असलेली जलवाहिनी आता फुटून पाणी वाया जात आहे. मुख्य रस्ता खोदून लोखंडी पाईपलाईन टाकण्यासाठीचे प्रयत्न आता पाणीपुरवठा विभागाला करावे लागणार आहेत. येथील इतर रस्ते, ड्रेनेज, पाणी, दिवे अशा महत्त्वाच्या समस्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. दोन वर्षे उलटून गेले तरीदेखील महापालिका सातारा-देवळाईकडे लक्ष देत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.