शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या पाणीपुरवठ्याचे लवकरच ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड ...

औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड सुरू केली. त्यामुळे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पाणीपुरवठ्याचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

शहरासाठी राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान ३ वर्ष लागणार आहेत. दरम्यानच्या काळात सध्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरात आणल्या जाणाऱ्या पाण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने पांडेय यांनी महापालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. सध्या पाण्याची मागणी वाढली आहे, परंतु वाढत्या मागणीनुसार पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यातच विविध राजकीय पक्ष महापालिका प्रशासनाकडे अतिरिक्त पाण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे जायकवाडीहून औरंगाबाद शहरात नेमके पाणी किती येते, शहरात कोणत्या भागात पाणी कमी पडते, पाण्याची गळती होते का, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने काय करता येईल या संदर्भात ऑडिट करण्याचे आदेश पांडेय यांनी दिल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंह देखील उपस्थित होते. पाण्याच्या ऑडिटचे काम प्राधिकरणाने करावे असे पांडेय यांनी सांगितले. त्याला अजयसिंह यांनी सहमती दर्शवली. पाणी पुरवठ्याच्या सध्याच्या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या कशा दूर केल्या जाऊ शकतील याबद्दल देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सूचना करावी असे पांडेय यांनी बैठकीच्या दरम्यान स्पष्ट केल्याचे पानझडे म्हणाले.

फ्लो मीटर तपासणे अत्यंत गरजेचे

अधीक्षक अभियंता अजयसिंह म्हणाले, पाणी पुरवठा योजनेवरील फ्लो मीटर बंद असल्याची माहिती मिळाली आहे. फ्लो मीटर सुरु आहेत का ते प्रथम तपासावे लागेल. हे मीटर बंद असतील तर ऑडिट करताना अडथळे येऊ शकतील, वॉटर ऑडिटसाठी फ्लो मीटर कार्यान्वित असणे गरजेचे आहे.