शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

शहराच्या पाणीपुरवठ्याचे लवकरच ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड ...

औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड सुरू केली. त्यामुळे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पाणीपुरवठ्याचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

शहरासाठी राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान ३ वर्ष लागणार आहेत. दरम्यानच्या काळात सध्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरात आणल्या जाणाऱ्या पाण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने पांडेय यांनी महापालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. सध्या पाण्याची मागणी वाढली आहे, परंतु वाढत्या मागणीनुसार पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यातच विविध राजकीय पक्ष महापालिका प्रशासनाकडे अतिरिक्त पाण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे जायकवाडीहून औरंगाबाद शहरात नेमके पाणी किती येते, शहरात कोणत्या भागात पाणी कमी पडते, पाण्याची गळती होते का, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने काय करता येईल या संदर्भात ऑडिट करण्याचे आदेश पांडेय यांनी दिल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंह देखील उपस्थित होते. पाण्याच्या ऑडिटचे काम प्राधिकरणाने करावे असे पांडेय यांनी सांगितले. त्याला अजयसिंह यांनी सहमती दर्शवली. पाणी पुरवठ्याच्या सध्याच्या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या कशा दूर केल्या जाऊ शकतील याबद्दल देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सूचना करावी असे पांडेय यांनी बैठकीच्या दरम्यान स्पष्ट केल्याचे पानझडे म्हणाले.

फ्लो मीटर तपासणे अत्यंत गरजेचे

अधीक्षक अभियंता अजयसिंह म्हणाले, पाणी पुरवठा योजनेवरील फ्लो मीटर बंद असल्याची माहिती मिळाली आहे. फ्लो मीटर सुरु आहेत का ते प्रथम तपासावे लागेल. हे मीटर बंद असतील तर ऑडिट करताना अडथळे येऊ शकतील, वॉटर ऑडिटसाठी फ्लो मीटर कार्यान्वित असणे गरजेचे आहे.