शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

शहराच्या पाणीपुरवठ्याचे लवकरच ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड ...

औरंगाबाद : शहरात विविध वसाहतीमध्ये पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. तीन दशके महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षांनी पाणी प्रश्नावर ओरड सुरू केली. त्यामुळे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पाणीपुरवठ्याचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

शहरासाठी राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान ३ वर्ष लागणार आहेत. दरम्यानच्या काळात सध्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरात आणल्या जाणाऱ्या पाण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने पांडेय यांनी महापालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. सध्या पाण्याची मागणी वाढली आहे, परंतु वाढत्या मागणीनुसार पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यातच विविध राजकीय पक्ष महापालिका प्रशासनाकडे अतिरिक्त पाण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे जायकवाडीहून औरंगाबाद शहरात नेमके पाणी किती येते, शहरात कोणत्या भागात पाणी कमी पडते, पाण्याची गळती होते का, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने काय करता येईल या संदर्भात ऑडिट करण्याचे आदेश पांडेय यांनी दिल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंह देखील उपस्थित होते. पाण्याच्या ऑडिटचे काम प्राधिकरणाने करावे असे पांडेय यांनी सांगितले. त्याला अजयसिंह यांनी सहमती दर्शवली. पाणी पुरवठ्याच्या सध्याच्या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या कशा दूर केल्या जाऊ शकतील याबद्दल देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सूचना करावी असे पांडेय यांनी बैठकीच्या दरम्यान स्पष्ट केल्याचे पानझडे म्हणाले.

फ्लो मीटर तपासणे अत्यंत गरजेचे

अधीक्षक अभियंता अजयसिंह म्हणाले, पाणी पुरवठा योजनेवरील फ्लो मीटर बंद असल्याची माहिती मिळाली आहे. फ्लो मीटर सुरु आहेत का ते प्रथम तपासावे लागेल. हे मीटर बंद असतील तर ऑडिट करताना अडथळे येऊ शकतील, वॉटर ऑडिटसाठी फ्लो मीटर कार्यान्वित असणे गरजेचे आहे.