शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

नितळीच्या जयलक्ष्मी साखर कारखान्याचा लिलाव करा

By admin | Updated: April 15, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे थकीत बिले न दिल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे थकीत बिले न दिल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. संबधित शेतकऱ्यांच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत जयलक्ष्मी कारखान्याचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत.उस्मानाबाद तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस गाळापासाठी दिला होता. शेतकऱ्यांना ऊसाचे थकीत पैसे कारखाना देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संबधित शेतकऱ्यांनी याची उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी संबधित शेतकऱ्यांच्या उसाची बिलाची रक्कम आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते.मात्र १४ एप्रिल पर्यंत जयलक्ष्मी कारखान्याने संबधित शेतकऱ्यांच्या ऊसाचे थकीत बिलाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न आदी कार्यक्रम केवळ कारखान्याने ऊसाचे बिल न दिल्यामुळे थांबले आहेत. तसेच याबरोबर घरात असलेले आजारी लोकांना दवाखान्यात घेवून जाण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशी तक्रार दाऊतपूर, मातोळा, गोरेवाडी, चिंचोली या गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जयलक्ष्मी कारखान्याचा लिलाव करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़३७ जणांच्या सह्याकारखान्याने ऊसाचे थकीत बिल दिले नसल्याचे ३७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. यात शिवाजी मोहिते, विजयकुमार बिराजदार, तमनप्पा बिराजदार, महादेव बेडजवळगे, मधुकर लांडगे, तुराब देशमुख, सिध्देश्वर पाटील, दिगबर पाटील, धनराज बिराजदार, किसन लांडगे, निर्मला भोसले, महादेव बिराजदार, गजानन बिराजदार, शिवाजी माळी, गुस्ताथ लांडगे,पार्वतीबाई पाटील, विजयकुमार बिराजदार, गोरबा पाटील, सतीश भोसले, संजय भुजबळ, महादेव साळुंके, मारुती यादव, बाबूराव गाडेकर, अशोक साखरे, प्रभु साखरे, गुंडाप्पा बिराजदार, लक्ष्मण साखरे आदींनी तक्रार केली होती. (प्रतिनिधी)