शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

नितळीच्या जयलक्ष्मी साखर कारखान्याचा लिलाव करा

By admin | Updated: April 15, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे थकीत बिले न दिल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे

उस्मानाबाद : तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे थकीत बिले न दिल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. संबधित शेतकऱ्यांच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत जयलक्ष्मी कारखान्याचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत.उस्मानाबाद तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस गाळापासाठी दिला होता. शेतकऱ्यांना ऊसाचे थकीत पैसे कारखाना देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संबधित शेतकऱ्यांनी याची उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी संबधित शेतकऱ्यांच्या उसाची बिलाची रक्कम आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते.मात्र १४ एप्रिल पर्यंत जयलक्ष्मी कारखान्याने संबधित शेतकऱ्यांच्या ऊसाचे थकीत बिलाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न आदी कार्यक्रम केवळ कारखान्याने ऊसाचे बिल न दिल्यामुळे थांबले आहेत. तसेच याबरोबर घरात असलेले आजारी लोकांना दवाखान्यात घेवून जाण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशी तक्रार दाऊतपूर, मातोळा, गोरेवाडी, चिंचोली या गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जयलक्ष्मी कारखान्याचा लिलाव करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़३७ जणांच्या सह्याकारखान्याने ऊसाचे थकीत बिल दिले नसल्याचे ३७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. यात शिवाजी मोहिते, विजयकुमार बिराजदार, तमनप्पा बिराजदार, महादेव बेडजवळगे, मधुकर लांडगे, तुराब देशमुख, सिध्देश्वर पाटील, दिगबर पाटील, धनराज बिराजदार, किसन लांडगे, निर्मला भोसले, महादेव बिराजदार, गजानन बिराजदार, शिवाजी माळी, गुस्ताथ लांडगे,पार्वतीबाई पाटील, विजयकुमार बिराजदार, गोरबा पाटील, सतीश भोसले, संजय भुजबळ, महादेव साळुंके, मारुती यादव, बाबूराव गाडेकर, अशोक साखरे, प्रभु साखरे, गुंडाप्पा बिराजदार, लक्ष्मण साखरे आदींनी तक्रार केली होती. (प्रतिनिधी)