शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

सर्वांचेच लक्ष मुंबईकडे लागून

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेना आणि भाजपात सुरू झालेल्या खेचाखेचीमुळे या चारही पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

औरंगाबाद : विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेना आणि भाजपात सुरू झालेल्या खेचाखेचीमुळे या चारही पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आघाडी आणि युती होणार की नाही, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून दावे- प्रतिदावे सुरू आहेत. हीच परिस्थिती शिवसेना आणि भाजपामध्ये आहे. दोन दिवसांपासून तर शिवसेना आणि भाजपाच्या संबंधात खूपच तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, तसेच शिवसेना भाजपासह इतर पक्षांची महायुती होणार हे लोकसभा निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. मात्र, आता निवडणुका जाहीर होऊन सहा दिवस झाले तरी अद्यापही जागावाटपावरून संघर्ष असल्याने आणि तो अधिकाधिक तीव्र होत असल्याने स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. शिवसेना आणि भाजपासह महायुतीची घोषणा उद्या सायंकाळपर्यंत होणे अपेक्षित आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा निर्णय दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याने हा निर्णय होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे तयारी नसलेल्या इच्छुक उमेदवारांमध्येही चलबिचल आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेपेक्षा भाजपाला अधिक जागा मिळाल्यामुळे शिवसेनेबरोबर सातत्याने औरंगाबाद महापालिकेत फरफटत जाणाऱ्या भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या बरोबरीनेच विधानसभेसाठी जागा मिळायला हव्यात असे वाटते. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र, भाजपा खूपच डोक्यावर चढत असल्याची भावना असून, त्यांना ११७ पेक्षा जास्त जागा देता कामा नये, असे वाटते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जागावाटपाचा तिढा काहीही करून सुटावा व आघाडी व्हावी, असे वाटत आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नंदकुमार घोडेले यांनी यासंदर्भात सांगितले की, जागावाटपावरून काही वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसत असले तरी शिवसेना आणि भाजपासह महायुती होईल हे निश्चित. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजित देशमुख म्हणाले की, महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडी व्हायला पाहिजे आणि आघाडी होईल, असा विश्वास आहे. लवकरात लवकर आघाडी व्हावी, असे वाटते.