शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

१२९ ग्रा.प़ंच्या निवडणुकांकडे लक्ष

By admin | Updated: July 6, 2017 23:51 IST

मानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीचे सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि प्रभागातील आरक्षणाचे काम निवडणूक विभागाने हाती घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षात मोठे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी लोकसंख्येच्या आधारावर थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडले गेल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच पदही थेट जनतेतून निवडले जाणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती, तशी मागणीही काही वर्षांपासून होत होती. नुकताच राज्य शासनाने सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. परभणी जिल्ह्यामध्ये ११८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत संपणार आहे. तर ११ ग्रामपंचायतीमधील सदस्य अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे ही संख्या १२९ झाली आहे.जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच हा निर्णय राबविला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. जनतेशी नाळ कायम असेल तरच सरपंचपद सोपे जाणार आहे. चांगले काम करणाऱ्यांना एक चांगली संधी यातून मिळणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील जिंंतूर तालुक्यातील ३४, पाथरी ७, परभणी २९, सेलू १२, गंगाखेड १३, सोनपेठ ३, मानवत ८, पूर्णा १४, पालम तालुक्यातील ९ या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. गंगाखेड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीमधील सर्वच सदस्य कलम १४ ब खाली अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे.