शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

१२९ ग्रा.प़ंच्या निवडणुकांकडे लक्ष

By admin | Updated: July 6, 2017 23:51 IST

मानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीचे सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि प्रभागातील आरक्षणाचे काम निवडणूक विभागाने हाती घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षात मोठे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी लोकसंख्येच्या आधारावर थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडले गेल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच पदही थेट जनतेतून निवडले जाणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती, तशी मागणीही काही वर्षांपासून होत होती. नुकताच राज्य शासनाने सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. परभणी जिल्ह्यामध्ये ११८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत संपणार आहे. तर ११ ग्रामपंचायतीमधील सदस्य अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे ही संख्या १२९ झाली आहे.जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच हा निर्णय राबविला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. जनतेशी नाळ कायम असेल तरच सरपंचपद सोपे जाणार आहे. चांगले काम करणाऱ्यांना एक चांगली संधी यातून मिळणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील जिंंतूर तालुक्यातील ३४, पाथरी ७, परभणी २९, सेलू १२, गंगाखेड १३, सोनपेठ ३, मानवत ८, पूर्णा १४, पालम तालुक्यातील ९ या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. गंगाखेड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीमधील सर्वच सदस्य कलम १४ ब खाली अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे.