शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

१२९ ग्रा.प़ंच्या निवडणुकांकडे लक्ष

By admin | Updated: July 6, 2017 23:51 IST

मानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नगराध्यक्षानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीचे सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि प्रभागातील आरक्षणाचे काम निवडणूक विभागाने हाती घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षात मोठे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी लोकसंख्येच्या आधारावर थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडले गेल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच पदही थेट जनतेतून निवडले जाणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती, तशी मागणीही काही वर्षांपासून होत होती. नुकताच राज्य शासनाने सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. परभणी जिल्ह्यामध्ये ११८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत संपणार आहे. तर ११ ग्रामपंचायतीमधील सदस्य अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे ही संख्या १२९ झाली आहे.जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच हा निर्णय राबविला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. जनतेशी नाळ कायम असेल तरच सरपंचपद सोपे जाणार आहे. चांगले काम करणाऱ्यांना एक चांगली संधी यातून मिळणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील जिंंतूर तालुक्यातील ३४, पाथरी ७, परभणी २९, सेलू १२, गंगाखेड १३, सोनपेठ ३, मानवत ८, पूर्णा १४, पालम तालुक्यातील ९ या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. गंगाखेड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीमधील सर्वच सदस्य कलम १४ ब खाली अनर्ह ठरल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उच्च न्यायालयाची स्थगिती आहे.