शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

बंदीवानांचे आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: March 23, 2016 01:07 IST

राजकुमार जोंधळे , लातूर गरिबीचे भांडवल न करता आयुष्यात आलेल्या संकटांवर ज्ञानाच्या बळावर मात करुन संधीचे सोने केले. ज्ञानाशिवाय अज्ञान दारिद्र्य आणि गरिबीही घालविता येत नाही,

राजकुमार जोंधळे , लातूरगरिबीचे भांडवल न करता आयुष्यात आलेल्या संकटांवर ज्ञानाच्या बळावर मात करुन संधीचे सोने केले. ज्ञानाशिवाय अज्ञान दारिद्र्य आणि गरिबीही घालविता येत नाही, हा बाबासाहेबांचा संदेश प्रमाण माणून आयुष्यातील वाटचाल केली तर संकटांना पळवून लावता येईल. यावर माझा विश्वास आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच माझे जीवन घडले आहे. आता बंदिवानांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करीत आहोत. तुरुंगात येणारा प्रत्येक कैदी परिस्थितीनुसार गुन्हेगार ठरतो. तो कारागृहातून बाहेर पडताना माणूस म्हणून जगला पाहिजे, असे संस्कार कारागृहात करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सातत्याने समुपदेशन करून बंदिवान माणूस म्हणून जगावा, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे लातूर जिल्हा कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हा कारगृह अधीक्षक राजेंद्र मरळे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील फाळेगाव या छोट्याच्या खेड्यात झाला. वडील हिंगोलीतील एका आडतीवर मुनीम म्हणून आजही काम करतात. घरात आई अशिक्षित असूनही, मुलांवर आईने केलेले संस्कार आज आयुष्यभराची शिदोरी ठरली आहे. वडिलांनी अपार कष्ट करुन आपल्या तीनही मुलांना शिक्षण दिले. याच शिक्षणाच्या बळावर आज या घरातील अज्ञान, दारिद्र्य आणि गरिबी दूर झाली आहे. बाबासाहेबांच्या विचारातूनच आजपर्यंत मला प्रेरणा मिळाली आहे. विशेष म्हणजे माझा जन्मच १४ एप्रिल रोजी झाला आहे. केवळ शिक्षणासाठी वडिलांनी हिंगोली येथे घर केले. काबाड-कष्ट करुन त्यांनी आम्हा भावंडांना शिक्षणासाठी साधने पुरविली. अभ्यासात असलेले सातत्य यामुळेच हे यश काबीज करता आले. वडिलांनी शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन हेच आमच्या यशस्वी जिवनाचे गमक आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचे पारायण आयुष्यभर करीत आलो आहे. यातून माझ्या जीवनात अमूलाग्र बदल घडत गेला. घरातील परिस्थिती हलाखीची असतानाही, वडिलांनी मात्र आमच्यासाठी प्रचंड कष्ट उपसले. हे श्रमानेच आमच्यामध्ये शिक्षणाची जिद्द पेरण्याचे काम केले. जालना जिल्ह्यात बहीण ग्रामसेवक म्हणून तर हिंगोली जिल्ह्यात भाऊ जि.प.त कर्मचारी आहे़