शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

नारेगाव येथील कचऱ्याचा डोंगर नष्ट करण्याचे प्रयत्न

By | Updated: December 7, 2020 04:01 IST

औरंगाबाद : नारेगाव येथील कचरा डेपोत महापालिकेने निव्वळ ४० वर्ष कचरा नेऊन टाकला. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली नाही. ...

औरंगाबाद : नारेगाव येथील कचरा डेपोत महापालिकेने निव्वळ ४० वर्ष कचरा नेऊन टाकला. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली नाही. स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेला हा कचरा नष्ट करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल यावर काम सुरू केल्याची माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

नारेगाव येथील नागरिकांनी चार वर्षांपूर्वी महापालिकेला कचरा टाकण्यास मज्जाव केला. शहरात अभूतपूर्व अशी कचरा कोंडी निर्माण झाली. शहराच्या आसपास कुठेही महापालिकेला कचरा टाकण्यासाठी जागा मिळाली नाही. शेवटी चिकलठाणा, पडेगाव आणि हर्सूल येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रयोग काही अंशी यशस्वी ठरला आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटला असला तरी नारेगावातील कचऱ्याचे डोंगर जशास तसे आहेत. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने खंडपीठातही दिले होते. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पुन्हा एकदा नारेगाव येथील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने कशा पद्धतीने विल्हेवाट लावता येईल यावर काम सुरू केले आहे. लवकरच या कामाचे अंदाजपत्रक तयार करून कृती आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

डिसेंबर महिना कचरा वर्गीकरणासाठी

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाचे पथक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शहरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये कचरा वर्गीकरणावर सर्वाधिक भर देण्यात येईल. कचऱ्यासाठी यापूर्वी काम केलेल्या सीआरटी संस्थेला काही जबाबदारी सोपविल्याचे पांडेय यांनी नमूद केले.

व्यापाऱ्यांना डस्टबिन ठेवण्याची सक्ती

शहरात व्यापारी दुकानासमोर डस्टबिन ठेवत नाहीत. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याने दोन स्वतंत्र डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येईल आणि एक जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.