शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

अर्थव्यवस्था आणि आरोग्य यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात आणि शहरात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यामध्ये अर्थकारण आणि आरोग्याची काळजी यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. ...

औरंगाबाद : जिल्ह्यात आणि शहरात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यामध्ये अर्थकारण आणि आरोग्याची काळजी यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. उद्योगांचे चक्र, जनसामान्यांची दैनंदिनी आणि राजकीय दबावाचा सारासार विचार करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्णय घेतल्याचे दिसते.

महापालिका आणि आरोग्य यंत्रणा संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या बाजूने असले तरी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी उद्योग संघटना सीआयआय, मसिआ, सीएमआयए, व्यापारी महासंघ यांच्याशी रविवारी दिवसभर चर्चा करून सायंकाळी सर्वंकष निर्णय घेतला. उद्योजकांनी रविवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपाययोजना आणि अर्थकारण याबाबतची वस्तुस्थिती मांडली.

उद्योगचक्र सुरळीत चालावे, हातावर पोट असणाऱ्यांचे नुकसान होऊ नये. या अनुषंगाने सर्व संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. त्यामुळे एका दबाव सर्व प्रशासकीय यंत्रणांवर होता. पगारदार यंत्रणेचे नुकसान होणार नाही, परंतु रोजंदारी मजुरांचे मोठे नुकसान होण्याची भीती अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्यानंतर त्यांनी रविवारी दुपारनंतर मनपा, आरोग्य, पोलीस प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतला.

सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर होणार असल्याच्या अफवेमुळे शहर आणि जिल्ह्यात संदिग्ध वातावरण निर्माण झाले होते. त्यातच खा. इम्तियाज जलील, आ. अतुल सावे आणि मनसेचे उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी १०० टक्के लॉकडाऊनला विरोध केला होता. लॉकडाऊन हा संसर्ग रोखण्यासाठी पर्याय असू शकत नाही. सामान्यांचे हाल होतील, अशी भूमिका घेत या पक्षांनी विरोधाचे हत्यार उपसले होते.

उद्योग वर्तुळातून निणर्यामुळे समाधान

सीआयआयचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रशासकीय यंत्रणांनी घेतलेला हा निर्णय संतुलन साधणारा निर्णय आहे. मुव्हमेंटवर बंधने असावीत आणि अर्थकारणही चालावे हे महत्त्वाचे आहे. उद्योगांचे १०० टक्के उत्पादन निर्यात आणि आयातीवर अवलंबून होते. लॉकडाऊन- सारख्या निर्णयामुळे उद्योगांसह सामान्यांपर्यंत परिणाम झाले असते. लॉकडाऊनचा निर्णय उत्पादकांसाठी आव्हानात्मक राहिला असता.

रविवारी उद्योजकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आले. उद्योजक कोरोना टेस्ट वाढविणार आहेत. शहरातही टेस्ट वाढविल्या पाहिजेत. व्याधिग्रस्तांना लसीकरण देऊ केली आहे, त्या धर्तीवर ४५ वर्षांपुढील उद्योगांतील कामगार यांनाही लस देण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. प्रत्येक कंपनीत शिबीर घेऊन जास्तीत लसीकरण करावे, अशी सूचना कुलकर्णी यांनी केली.