शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मराठवाड्याला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:02 IST

विकास राऊत औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वंकष अनुशेष दूर करण्यासाठी १९९४ साली स्थापन झालेल्या मराठवाडा, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र विकास ...

विकास राऊत

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वंकष अनुशेष दूर करण्यासाठी १९९४ साली स्थापन झालेल्या मराठवाडा, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपली असून, मुदतवाढीबाबत सरकार गंभीर नाही. त्यामुळे या भागाला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप मराठवाडा विकास मंडळावरील माजी तज्ज्ञ सदस्यांनी लोकमतशी बोलताना केला.

मंडळाला मुदतवाढ मिळाली तर अधिकार द्यावेत अन्यथा मुदतवाढ देऊन काही उपयोग नाही, राजकीय पुनर्वसनासाठी व कागदोपत्री मंडळाला काही अर्थ नाही. नागपूरमध्ये झालेल्या करारानुसार विदर्भ आणि मराठवाड्याला काही आश्वासने दिली होती. त्यानुसार केंद्र शासनाने दखल घेऊन राज्यघटनेत दुरुस्ती करून कलमे टाकण्यात आली होती. त्या कलमांचे पालन होताना दिसत नाही. मागासलेल्या भागाला मागेच ठेवायचे असेल तर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होत असताना दिलेली आश्वासने खोटी होती का, असा प्रश्न माजी सदस्यांनी उपस्थित केला आहे.

मंडळाचे माजी अध्यक्ष खा. डॉ. भागवत कराड यांच्यासह डॉ. अशोक बेलखोडे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, बी. बी. ठोंबरे, कृष्णा लव्हेकर आणि अभियंता शंकर नागरे या मंडळावरील सदस्यांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपला आहे.

माजी अध्यक्ष खा. डॉ. कराड यांनी सांगितले की, मंडळांनी पाठविलेल्या ठरावांचा शासनस्तरावर काहीही विचार झाला नाही. मंडळाला मुदतवाढ मिळण्यासाठी सर्व भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. अनुदान, अधिकार असावेत, याबाबत शासनाला मागेच कळविले आहे. मंडळाने दिलेल्या ठरावावर सरकारने काहीही निर्णय घेतला नाही.

घटनेने दिलेल्या अधिकाराचा भंग होतोय

मंडळाचे माजी सदस्य शंकर नागरे यांनी सांगितले, संयुक्त महाराष्ट्राची बांधणी होत असताना नागपूर करारात मराठवाड्याला काही आश्वासने दिली होती. त्या कराराचा अवमान होतो आहे का, असे वाटू लागले आहे. राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा भंग होतो आहे. या भागाला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करू नये. अनुशेष भरून काढण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. मंडळ असणे हे विभागाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. विभागाच्या अर्थ तरतुदीसाठी मंडळ असणे गरजेचे आहे. वैधानिक अधिकारांसह अनुशेष दूर करण्याची ताकद मंडळाला मिळाली पाहिजे. तरच मंडळाचा मराठवाड्याला उपयोग होईल.

मंडळाच्या कार्यक्षेत्र आणि कार्यप्रणातील बदल व्हावा

मंडळावरील माजी सदस्य बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले, सध्या सरकारचे मंडळाबाबतचे धोरण पाहिले तर मंडळाची आवश्यकता त्यांना वाटत नाही, असे दिसते आहे. राज्यघटनेतील अनुच्छेदानुसार या मंडळाची निर्मिती ज्या उद्देशासाठी केली. तो उद्देश सफल होत नसेल तर उपयोग काय? विभागाचा विकासाचा अनुशेष भरायचा असेल तर अंमलबजावणीसाठी विकास मंडळाची आवश्यकता आहे. मात्र, मंडळाच्या कार्यक्षेत्र आणि कार्यप्रणातील बदल झाला पाहिजे. सल्लागार म्हणून ते मंडळ नको. विकास मंडळाला काही अनुदान, निधी, अधिकार द्यावेत असे सरकारला वाटतच नाही. मागील पाच वर्षांत राज्यपालांनी एकाही प्रस्तावाची नोंद घेतलेली नाही.