शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

मराठवाड्याला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:02 IST

विकास राऊत औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वंकष अनुशेष दूर करण्यासाठी १९९४ साली स्थापन झालेल्या मराठवाडा, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र विकास ...

विकास राऊत

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वंकष अनुशेष दूर करण्यासाठी १९९४ साली स्थापन झालेल्या मराठवाडा, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपली असून, मुदतवाढीबाबत सरकार गंभीर नाही. त्यामुळे या भागाला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप मराठवाडा विकास मंडळावरील माजी तज्ज्ञ सदस्यांनी लोकमतशी बोलताना केला.

मंडळाला मुदतवाढ मिळाली तर अधिकार द्यावेत अन्यथा मुदतवाढ देऊन काही उपयोग नाही, राजकीय पुनर्वसनासाठी व कागदोपत्री मंडळाला काही अर्थ नाही. नागपूरमध्ये झालेल्या करारानुसार विदर्भ आणि मराठवाड्याला काही आश्वासने दिली होती. त्यानुसार केंद्र शासनाने दखल घेऊन राज्यघटनेत दुरुस्ती करून कलमे टाकण्यात आली होती. त्या कलमांचे पालन होताना दिसत नाही. मागासलेल्या भागाला मागेच ठेवायचे असेल तर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होत असताना दिलेली आश्वासने खोटी होती का, असा प्रश्न माजी सदस्यांनी उपस्थित केला आहे.

मंडळाचे माजी अध्यक्ष खा. डॉ. भागवत कराड यांच्यासह डॉ. अशोक बेलखोडे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, बी. बी. ठोंबरे, कृष्णा लव्हेकर आणि अभियंता शंकर नागरे या मंडळावरील सदस्यांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपला आहे.

माजी अध्यक्ष खा. डॉ. कराड यांनी सांगितले की, मंडळांनी पाठविलेल्या ठरावांचा शासनस्तरावर काहीही विचार झाला नाही. मंडळाला मुदतवाढ मिळण्यासाठी सर्व भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. अनुदान, अधिकार असावेत, याबाबत शासनाला मागेच कळविले आहे. मंडळाने दिलेल्या ठरावावर सरकारने काहीही निर्णय घेतला नाही.

घटनेने दिलेल्या अधिकाराचा भंग होतोय

मंडळाचे माजी सदस्य शंकर नागरे यांनी सांगितले, संयुक्त महाराष्ट्राची बांधणी होत असताना नागपूर करारात मराठवाड्याला काही आश्वासने दिली होती. त्या कराराचा अवमान होतो आहे का, असे वाटू लागले आहे. राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा भंग होतो आहे. या भागाला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करू नये. अनुशेष भरून काढण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. मंडळ असणे हे विभागाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. विभागाच्या अर्थ तरतुदीसाठी मंडळ असणे गरजेचे आहे. वैधानिक अधिकारांसह अनुशेष दूर करण्याची ताकद मंडळाला मिळाली पाहिजे. तरच मंडळाचा मराठवाड्याला उपयोग होईल.

मंडळाच्या कार्यक्षेत्र आणि कार्यप्रणातील बदल व्हावा

मंडळावरील माजी सदस्य बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले, सध्या सरकारचे मंडळाबाबतचे धोरण पाहिले तर मंडळाची आवश्यकता त्यांना वाटत नाही, असे दिसते आहे. राज्यघटनेतील अनुच्छेदानुसार या मंडळाची निर्मिती ज्या उद्देशासाठी केली. तो उद्देश सफल होत नसेल तर उपयोग काय? विभागाचा विकासाचा अनुशेष भरायचा असेल तर अंमलबजावणीसाठी विकास मंडळाची आवश्यकता आहे. मात्र, मंडळाच्या कार्यक्षेत्र आणि कार्यप्रणातील बदल झाला पाहिजे. सल्लागार म्हणून ते मंडळ नको. विकास मंडळाला काही अनुदान, निधी, अधिकार द्यावेत असे सरकारला वाटतच नाही. मागील पाच वर्षांत राज्यपालांनी एकाही प्रस्तावाची नोंद घेतलेली नाही.