शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 7, 2017 23:08 IST

लातूर : आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत़

लातूर : आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत़ या आरक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेकडून होत आहे़ हा त्यांचा डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा सवालही महाराष्ट्र हमाल मापाडी पंचायत महामंडळाचे अध्यक्ष डॉ़बाबा आढाव यांनी येथे शनिवारी केला़अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३८ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ विचारमंचावर स्वागताध्यक्ष प्रा़एस़ व्ही़ जाधव, उद्घाटक डॉ़ बशारत अहमद, अ‍ॅड़ वसंत फाळके, उत्तमराव पाटील, डॉ़ अशोक चोपडे, प्रा़ जी़ए़ उगले यांची उपस्थिती होती़ प्रारंभी जातीच्या उतरंडीवर बाबा आढाव यांच्या हस्ते फुली मारण्यात आली़ यावेळी ते म्हणाले, जातीअंताचे बिमोड करणारे शिक्षणही दिले जात नाही़ जात ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे़ स्वातंत्र्यानंतरही जातव्यवस्था अधिक बळकट झाली आहे़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकारने घ्यायला हवा, असेही डॉ़बाबा आढाव म्हणाले़ आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन, ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव इथल्या राजकीय व्यवस्थेचा सुरू आहे़ शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही़ शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते़ शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव दिला पाहिजे़ ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली ती माणसे अधिक धार्मिक झाली़ भविष्यात या राजकीय व्यवस्थेडून होणाऱ्या संविधान बदलाचा धोका आहे़ तो वेळीच हाणून पाडला पाहिजे़ त्यासाठी प्रत्येक सत्यशोधकीने सजग आणि दक्ष राहिले पाहिजे असेही ते म्हणाले़ यावेळी उद्घाटक बशारत अहमद यांनीही मार्गदर्शन केले़ अधिवेशनाला लातूरसह सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, सातारा, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़