शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

राजकीय नेत्यांवर नव्हे, साहित्य संमेलनातील अपप्रवृत्तीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. या अपप्रवृत्तींवर उदाहरणांसह प्रहार केला आहे. त्यात कोणत्याही ...

औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. या अपप्रवृत्तींवर उदाहरणांसह प्रहार केला आहे. त्यात कोणत्याही राजकीय नेत्यांवर टीका करण्यात आलेली नाही. ज्यांना मराठी भाषा समजते, त्यांना महामंडळ आणि माझी भूमिका काय आहे हे 'अक्षरयात्रा'चे अध्यक्षीय वाचल्यास समजेल, अशा शब्दांत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. तसेच अध्यक्षीय मनोगतामधील प्रत्येक शब्दावर आपण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक 'अक्षययात्रा'च्या अध्यक्षीयमध्ये मराठी साहित्य संमेलनात घुसलेल्या अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. त्यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठाले पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली. महामंडळाच्या वार्षिकात कोणावरही टीका केलेली नाही. साहित्य महामंडळाचा उपयोग कोणी स्वत:साठी करू नये, साहित्य संमेलनात घुसलेल्या अनिष्ट वृत्तीमुळे संमेलन धंदा म्हणून वापरले जाऊ नये, यासाठी महामंडळाने जाहीर भूमिका घेतली आहे. मागील वर्षी ब्राह्मण साहित्य संमेलनावर अधिकृतपणे भूमिका घेतली होती. यावर्षी नाशिक येथे होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनादरम्यान घडलेल्या घटना उदाहरणासह उजेडात आणल्या आहेत. यातून साहित्य संमेलनात सुधारणा व्हावी, हीच अपेक्षा आहे. साहित्य संमेलन हे लोकांचे झाले पाहिजे. त्यासाठी राजकीय व्यक्ती, सरकारचाच पैसा असू नये. साहित्यप्रेमींचा पैसा नसेल तर संमेलन निव्वळ राजकीय नेत्यांचे किंवा सरकारचेच होईल. साहित्य महामंडळाला हेच नको आहे. मागील वर्षी उस्मानाबाद येथे झालेले साहित्य संमेलन कोणत्याही राजकीय मदतीशिवाय आणि अवघ्या तीन जणांनी मेहनत घेत कमी पैशांत यशस्वी करून दाखविले आहे. त्याच पद्धतीचे संमेलन नाशिक येथे घेतले जावे, हीच अपेक्षा निमंत्रक संस्थेकडे संमेलन देताना व्यक्त केली होती. ती त्यांनाही मान्य होती; मात्र संमेलनाचा स्वागताध्यक्ष निवडण्याचा असलेल्या अधिकाराचा वापर करून निधी संकलनाचे काम स्वागताध्यक्षावर सोपविल्याचेही ठाले पाटील यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला महामंडळाचे कार्यवाह डॉ.दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांची उपस्थिती होती.

चौकट,

चर्चेतून दिशा मिळावी

मराठी साहित्य संमेलनात घुसलेल्या अपप्रवृत्तीवर मी लिहिले आहे. भूमिका घेतली आहे. ती अनेकांना आवडेल, अनेकांना आवडणार नाही. दोन्ही बाजूची मते मला मान्य आहेत. त्यावर चर्चा व्हावी. या चर्चेतून दिशा मिळावी. साहित्य संमेलन हे निव्वळ साहित्यासाठी व्हावे, हीच अपेक्षा असल्याचेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले. महामंडळाचा कार्यकाळ आणखी एक वर्ष असणार आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहून योग्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडून महामंडळ गेल्यानंतर बोलून, भूमिका घेऊन उपयोग होणार नाही. ती आताच घेतली पाहिजे. त्यानुसार ती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.