शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

हल्ल्याने पुरोगामी विचार संपणार नाही़़

By admin | Updated: February 22, 2015 00:37 IST

लातूर : ‘ सवाल ये नही की शीशा कैसे टुटा, सवाल ये है की पत्थर कहाँ से छुटा’ असा जळजळीत सवाल करून कॉ़ गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व संताप व्यक्त करीत

लातूर : ‘ सवाल ये नही की शीशा कैसे टुटा, सवाल ये है की पत्थर कहाँ से छुटा’ असा जळजळीत सवाल करून कॉ़ गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व संताप व्यक्त करीत लातुरातील कार्यकर्त्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली़ मान्यवरांनी श्रध्दांजली देतानाच पुरोगामी विचारांवरील हे हल्ले विचार संपवू शकणार नाहीत़ यामुळे उलट पुरोगामी विचारांची धार वाढत राहील, असा खणखणीत ईशाराही दिला़४अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज जिल्ह्यातील पुरोगामी संघटनांच्या कृती समितीने बंदमध्ये सहभागी होण्याची हाक दिली आहे. भारतीय कम्युनिष्ठ पक्षाने पुकारलेल्या या बंदला राज्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठींबा दिला आहे. या बंदमध्ये सहभागी होऊन पुरोगामी विचारांवरील हल्ल्याचा लातुरकरांनी निषेध करावा, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर गोमारे, अ‍ॅड. उदय गवारे, रामकुमार रायवाडीकर आणि कॉ, विठ्ठल मोरे आदींनी केले आहे. शिवाय कृती समितीच्या वतीने सायंकाळी पाच वाजता टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन केले आहे. ४लातूर बंदला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला असून पक्ष कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे यांनी दिली़अखेर गोविंद पानसरे हे नरेंद्र दाभोळकर यांच्याप्रमाणे आपल्याला सोडून गेले. पण विचार ठेवून गेले आहेत. केवळ पुरोगामी विचार मांडल्यानेच त्यांच्यावर हल्ला झाला, परंतु पुरोगामी विचार संपणार नाही, कारण ‘सत्य परेशान हो सकता, पराजित नही.’ असंख्य पाय असलेल्या गोमीचा एक पाय निकामी झाल्याने गोम चालायची थांबत नाही, हे ध्यानात घ्यावे. पुरोगामी चळवळ आणि विचार आपल्या इतर पायांवर बुलंद राहील. तो बुलंद करण्यासाठी नव्या जोमाने कामाला लागणे हीच खरी पानसरेंना श्रध्दांजली आहे. -अ‍ॅड. अण्णाराव पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र विकास आघाडीडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावरील हल्ला अशाच पध्दतीने पचविला गेला. ना आरोपीचा मागमूस लागला ना खुन्याची माहिती. त्याचीच पुनरावृत्ती आता अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याने होत आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे घरा-घरात दाभोळकर आणि घरा-घरात पानसरे तयार होतील. गांधी मेले पण, गांधीजींचा विचार आज जगात गौरविला जातो. अशा शक्तींना कुणीही भीक घालणार नाही. कार्यकर्त्यांनी आपला विचार आता नव्याने पुढे येऊन मांडण्याची गरज आहे़ - प्रा़ माधव बावगे, अंनिस, लातूरया देशात सर्वांत पुरोगामीवाद्यांकडी प्रतिगामी लोकांना भीती वाटत असल्याने पुरोगामी विचारांचा अंत करण्यासाठीच काही लोक आता जिवावर उठले आहेत़ त्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे़ सध्या ‘हिंदूत्ववादी’ परिवार आणि ‘संविधान परिवार’ हे दोन गट देशात निर्माण झाले आहेत़ धर्मांध शक्तीच्या विरोधात आता सर्व संविधानवादी विचार माणणाऱ्यांनी एक विचार ठेवून एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे़ असे हल्ले होत आहेत़ विशेष म्हणजे अशा घटनांना सरकारही पाठीशी घालताना दिसते आहे. याला आता सर्व जनमाणसांतून विरोध व्हायला हवा. -अ‍ॅड. उदय गवारे, शेकाप, लातूर