शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याने पुरोगामी विचार संपणार नाही़़

By admin | Updated: February 22, 2015 00:37 IST

लातूर : ‘ सवाल ये नही की शीशा कैसे टुटा, सवाल ये है की पत्थर कहाँ से छुटा’ असा जळजळीत सवाल करून कॉ़ गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व संताप व्यक्त करीत

लातूर : ‘ सवाल ये नही की शीशा कैसे टुटा, सवाल ये है की पत्थर कहाँ से छुटा’ असा जळजळीत सवाल करून कॉ़ गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व संताप व्यक्त करीत लातुरातील कार्यकर्त्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली़ मान्यवरांनी श्रध्दांजली देतानाच पुरोगामी विचारांवरील हे हल्ले विचार संपवू शकणार नाहीत़ यामुळे उलट पुरोगामी विचारांची धार वाढत राहील, असा खणखणीत ईशाराही दिला़४अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज जिल्ह्यातील पुरोगामी संघटनांच्या कृती समितीने बंदमध्ये सहभागी होण्याची हाक दिली आहे. भारतीय कम्युनिष्ठ पक्षाने पुकारलेल्या या बंदला राज्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठींबा दिला आहे. या बंदमध्ये सहभागी होऊन पुरोगामी विचारांवरील हल्ल्याचा लातुरकरांनी निषेध करावा, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर गोमारे, अ‍ॅड. उदय गवारे, रामकुमार रायवाडीकर आणि कॉ, विठ्ठल मोरे आदींनी केले आहे. शिवाय कृती समितीच्या वतीने सायंकाळी पाच वाजता टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन केले आहे. ४लातूर बंदला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला असून पक्ष कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे यांनी दिली़अखेर गोविंद पानसरे हे नरेंद्र दाभोळकर यांच्याप्रमाणे आपल्याला सोडून गेले. पण विचार ठेवून गेले आहेत. केवळ पुरोगामी विचार मांडल्यानेच त्यांच्यावर हल्ला झाला, परंतु पुरोगामी विचार संपणार नाही, कारण ‘सत्य परेशान हो सकता, पराजित नही.’ असंख्य पाय असलेल्या गोमीचा एक पाय निकामी झाल्याने गोम चालायची थांबत नाही, हे ध्यानात घ्यावे. पुरोगामी चळवळ आणि विचार आपल्या इतर पायांवर बुलंद राहील. तो बुलंद करण्यासाठी नव्या जोमाने कामाला लागणे हीच खरी पानसरेंना श्रध्दांजली आहे. -अ‍ॅड. अण्णाराव पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र विकास आघाडीडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावरील हल्ला अशाच पध्दतीने पचविला गेला. ना आरोपीचा मागमूस लागला ना खुन्याची माहिती. त्याचीच पुनरावृत्ती आता अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याने होत आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे घरा-घरात दाभोळकर आणि घरा-घरात पानसरे तयार होतील. गांधी मेले पण, गांधीजींचा विचार आज जगात गौरविला जातो. अशा शक्तींना कुणीही भीक घालणार नाही. कार्यकर्त्यांनी आपला विचार आता नव्याने पुढे येऊन मांडण्याची गरज आहे़ - प्रा़ माधव बावगे, अंनिस, लातूरया देशात सर्वांत पुरोगामीवाद्यांकडी प्रतिगामी लोकांना भीती वाटत असल्याने पुरोगामी विचारांचा अंत करण्यासाठीच काही लोक आता जिवावर उठले आहेत़ त्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे़ सध्या ‘हिंदूत्ववादी’ परिवार आणि ‘संविधान परिवार’ हे दोन गट देशात निर्माण झाले आहेत़ धर्मांध शक्तीच्या विरोधात आता सर्व संविधानवादी विचार माणणाऱ्यांनी एक विचार ठेवून एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे़ असे हल्ले होत आहेत़ विशेष म्हणजे अशा घटनांना सरकारही पाठीशी घालताना दिसते आहे. याला आता सर्व जनमाणसांतून विरोध व्हायला हवा. -अ‍ॅड. उदय गवारे, शेकाप, लातूर