शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नुकसानग्रस्त ५० कुटुंबांना मदतीचे धनादेश सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:02 IST

कन्नड : तालुक्यातील सात मंडळांत अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करून सोयीसुविधा तात्काळ ...

कन्नड : तालुक्यातील सात मंडळांत अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करून सोयीसुविधा तात्काळ देण्यात याव्यात, त्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून ग्रामस्थांना मदत देण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कन्नड येथील गजानन हेरिटेजमध्ये झालेल्या आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते, तर आमदार उदयसिंग राजपूत यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार मदतीचे धनादेश सुपुर्द करण्यात आले.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, रस्ते, पूल, मोबाइल टॉवर, महावितरण, पाझर तलाव, केटी वेअर, गावलगतचे तलाव याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाचा आढावा घेतला. खाजगी शेतजमिनीचे झालेले नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना आदेशित केले. नागद, सायगव्हाण, पिशोर येथील ५० कुटुंबांच्या घरात पावसाचे पाणी शिरून झालेल्या नुकसानीसाठी प्रत्येक कुटुंबास कपडे व भांडी घेण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात पाच हजारांच्या मदतीचे धनादेश सुपुर्द करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांच्यासह सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.