शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मनपा निधीतून ५० कोटींचे डांबरी रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:03 IST

औरंगाबाद : शहरात यापुढे एकही सिमेंट रस्ता तयार न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या तिजोरीतून ५० कोटी रुपये ...

औरंगाबाद : शहरात यापुढे एकही सिमेंट रस्ता तयार न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या तिजोरीतून ५० कोटी रुपये खर्च करून काही डांबरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या कामासाठी अंदाजपत्रक तयार केले असून, प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडून मंजुरी मिळताच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शहरातील जुन्या डांबर लॉबीला पुन्हा एकदा चांगले दिवस येणार आहेत.

शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून सुरुवातीला २५ कोटींच्या निधीतून ५ रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यानंतर, १०० कोटींच्या निधीतून ३० रस्त्यांची आणि आता १५२ कोटींच्या निधीतून २३ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत ५८ रस्त्यांची कामे पूर्ण होत असल्याने, शहरातील मुख्य रस्त्यांची बहुतांश कामे मार्गी लागली आहेत, तसेच मागील पाच वर्षांत नगरसेवकांनी मनपा निधीतून वॉर्डातील रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत, तरीही मुख्य रस्त्यांची काही कामे अजूनही शिल्लक आहेत. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार शहरात एकही नवीन सिमेंट रस्ता न तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपा निधीतून रस्त्यांसाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश मनपा प्रशासक यांनी शहर अभियंता यांना दिले. त्यानुसार, शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी महापालिकेच्या ५० कोटींच्या निधीतून केल्या जाणाऱ्या रस्त्यांचा डीपीआर तयार केला असून, आठवडाभरात आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याचे सांगितले. मनपाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये रस्त्यांच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीची तरतूद केली जाणार आहे.

महापालिका एनओसी देणार नाही

आमदार निधी, खासदार निधी आणि शासनाकडून विशेष अनुदान आणून शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. भविष्यात महापालिका या कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.