शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जीएसटी,नोटाबंदी,महागाईचा जाब विचारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:25 IST

घाईघाईने सुरु केलेल्या जीएसटीमुळे शहरातील व्यापार संकटात आला आहे. तर नोटबंदीमुळे अनेकांना नोकºयांना मुकावे लागले असून गरीब, कष्टकºयांचा घामाचा पैसा या माध्यमातून सरकारने काढून घेतला आहे. दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे. सणासुदीच्या काळात सरकारने रेशनवर मिळणारी साखरही बंद करुन टाकली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: घाईघाईने सुरु केलेल्या जीएसटीमुळे शहरातील व्यापार संकटात आला आहे. तर नोटबंदीमुळे अनेकांना नोकºयांना मुकावे लागले असून गरीब, कष्टकºयांचा घामाचा पैसा या माध्यमातून सरकारने काढून घेतला आहे. दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे. सणासुदीच्या काळात सरकारने रेशनवर मिळणारी साखरही बंद करुन टाकली आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करणाºया या निर्णयांचा जाब विचारण्याची संधी महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. त्यामुळे इथे कमळ, तिथे कमळ असा प्रचार करणाºया भाजपाच्या निशाणी कलम करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवारी जुन्या नांदेडातील चौफाळा येथील निरंजन आश्रम शिवमंदिरामध्ये करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, आ.डी.पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. विजय खडसे, महापौर शैलजा स्वामी, माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर शफी अहेमद कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या सभेत खा. चव्हाण यांनी जुन्या नांदेडातील शेषेप्पा राखेवार, अमिन कुरेशी या जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांची आठवण केली. या भागातील जनतेने शंकरराव चव्हाणांपासून काँग्रेसला साथ दिली आहे. या भागातील जनतेने काँग्रेसवर टाकलेल्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे ते म्हणाले. तीन वर्षांपूर्वी ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने कुणाचे अच्छे दिन आणले, असा प्रश्न त्यांनी केला. पेट्रोलचे भाव ८१ रुपयांवर पोहोचले आहेत.रेशन दुकानावर मिळणारी साखरही बंद करण्यात आली आहे. महाराष्टÑ आत्महत्या करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे. ही बाबच राज्याची परिस्थिती निदर्शनास आणते. त्यामुळे नांदेडात कमळ फुलवण्याचे स्वप्न पाहणाºया भाजपाचे कमळ नांदेडमध्ये कलम करा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपाला एमआयएमकडून साथ दिली जात आहे. मुस्लिम मताच्या विभागणीतून धर्मांध शक्तीला सत्तेवर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तो प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. भाजपाकडे आज नेता नाही. शिवसेनेचा आमदार भाजपा पक्ष चालवित आहे. या पक्षाचा जाहीरनामा हा केवळ अशोकराव चव्हाणांना शिव्या देणे हाच आहे. भाजपाकडे मूळ कार्यकर्तेही राहिले नसून काळे धंदे लपविण्यासाठीच प्रवेश केलेली मंडळी आता भाजपातून पुढे येत आहे.देशासाठी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी दिलेले योगदान लपवून देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. दिनदयाल उपाध्याय यांना पुढे आणले जात आहे. भाजप सरकार गांधींचे नाव पुस्तकातून काढून टाकत असले तरी प्रत्येकाच्या मनात असलेल्या काँग्रेसला दूर कसे करणार, असा सवालही त्यांनी केला. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयात राष्टÑवादी काँग्रेसची घड्याळ १० वाजून १० मिनिटांनी बंदच पडल्याची टीकाही त्यांनी केली.आ. रणपिसे यांनी मतांची विभागणी करण्यासाठी एमआयएम, बहुजन विकास आघाडी असे प्रयोग होत आहेत. त्यांना जनता थारा देणार नसल्याचे सांगितले. आ. सावंत यांनी मनपा निवडणूक प्रचारात राज्यात अनेक ठिकाणी पॅकेजची घोषणा केली मात्र तीन वर्षांनंतरही एक छदामही तेथे पोहोचला नाही. नांदेडमध्ये अशा पॅकेजच्या घोषणा होतील. मात्र भाजपासारख्या फेकू पक्षावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले़ आ. राजूरकर यांनी या निवडणुकीत एमआयएमला भाजपा चालवित असल्याचा आरोप केला. स्मार्ट सिटी योजनेत नांदेडला ५८ टक्के गुण मिळूनही केवळ आकसापोटी भाजपा सरकारने नांदेडचा समावेश केला नाही.कार्यक्रमास गंगाधर सोंडारे, सुमती व्याहाळकर, नारायण श्रीमनवार, संतोष पांडागळे, मंगला धुळेकर, अनिता हिंगोले, पुष्पाताई शर्मा, कविता कळसकर, माजी महापौर प्रकाश मुथा, सतीश राखेवार, लक्ष्मीकांत गोणे, प्रल्हाद सुरकुंटवार, गोविंद पोपूलवार,अमित काबरा, गंगाप्रसाद काकडे, शहाजी नळगे, मनान चौधरी, एकनाथराव दासरवार, शिवानंद चमेवार, अ‍ॅड. सिद्दीकी, प्रल्हाद कोकुलवार, अंबादास रातोळे, राधेश्याम राखेवार, अशोक पट्टेकर यांची उपस्थिती होती़