शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

शहरात कृत्रिम पाणीटंचाई...

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटीचा करार रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटीचा करार रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कंपनी बंद होणार असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. ज्या वसाहतींना पाणी देण्यात येत आहे, तेथील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. कंपनीच्या कारभाराला आता मनपाचे अधिकारीही जाम वैतागले आहेत.मनपाने ४ जुलै रोजी कंपनीला करार रद्द का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस बजावली आहे. नोटीसचे उत्तर एक महिन्यात द्यावे, असेही मनपाने म्हटले होते. ३ आॅगस्ट रोजी नोटीसची मुदत संपत आहे. कंपनीने मनपाच्या नोटीसचे उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच मनपाला उत्तरही प्राप्त होणार आहे. शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा मनपातर्फे चालविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीही केली आहे. ऐन पावसाळ्यात शहरातील काही वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागतो. औरंगाबाद वॉटर युटिलिटीमधील अनेक अधिकारी व कर्मचारी नोकरी सोडून निघून गेले आहेत. जे कर्मचारी कार्यरत आहेत, ते मोबाईल बंद ठेवत आहेत.पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या अनेक तक्रारी मनपाकडे येत आहेत. मनपा अधिकाऱ्यांना पाण्याच्या टाकीवर किंवा घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करावा लागतो.