शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कृत्रिम पाणीटंचाई...

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटीचा करार रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटीचा करार रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कंपनी बंद होणार असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. ज्या वसाहतींना पाणी देण्यात येत आहे, तेथील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. कंपनीच्या कारभाराला आता मनपाचे अधिकारीही जाम वैतागले आहेत.मनपाने ४ जुलै रोजी कंपनीला करार रद्द का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस बजावली आहे. नोटीसचे उत्तर एक महिन्यात द्यावे, असेही मनपाने म्हटले होते. ३ आॅगस्ट रोजी नोटीसची मुदत संपत आहे. कंपनीने मनपाच्या नोटीसचे उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच मनपाला उत्तरही प्राप्त होणार आहे. शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा मनपातर्फे चालविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीही केली आहे. ऐन पावसाळ्यात शहरातील काही वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागतो. औरंगाबाद वॉटर युटिलिटीमधील अनेक अधिकारी व कर्मचारी नोकरी सोडून निघून गेले आहेत. जे कर्मचारी कार्यरत आहेत, ते मोबाईल बंद ठेवत आहेत.पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या अनेक तक्रारी मनपाकडे येत आहेत. मनपा अधिकाऱ्यांना पाण्याच्या टाकीवर किंवा घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करावा लागतो.