शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट टाकणाऱ्यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:02 IST

औरंगाबाद: हिंदू धर्माविषयी आणि देवतांविषयी मित्रांच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व एक तरुणीला अश्लील शेरे व कमेंट ऐकविणाऱ्या ...

औरंगाबाद: हिंदू धर्माविषयी आणि देवतांविषयी मित्रांच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व एक तरुणीला अश्लील शेरे व कमेंट ऐकविणाऱ्या तरुणांना पोलीस पाठीशी घालत असून त्यांना अटक न करता नोटीस देऊन सोडून दिल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. या प्रकरणात अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा का नोंदविला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात हिंदू धर्माविषयी आणि देवतांविषयी

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चार आरोपींविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आरोपी मोठ्या घरचे असल्यामुळे पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. कडक कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. या निवेदनावर शैलेश पत्की आणि विवेक बाप्ते यांच्या सह्या आहेत.

अर्थ मुनीश देवपुरी, रितेश जाधव, अंकित अविनाश छकडी आणि आदित्य राजू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आता हे मोबाईल न्याय सहाय्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीपैकी एक तरुण हे आयआयटी पवई येथे शिकत आहे. अन्य दोनजण मुंबईतील झेव्हियर्स कॉलेजमध्ये तर एक जण अमेरिकेत शिक्षण घेतात.

आरोपीनी तक्रारदार तरुणीला उद्देशून अश्लील आणि घाणेरडी भाषा वापरली असताना पोलिसांनी केवळ देवदेवतांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी तक्रारदार तरुणीचा विनयभंग केला असताना गुन्हा नोंदविताना याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. बड्या प्रस्थांची आरोपी मुले असल्याने पोलिसांनी त्यांना अटक न करता त्यांना केवळ नोटीस देउन सोडून देत पाठीशी घातल्याची चर्चा होत आहे. विश्व हिंदू परिषदेने अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

कोट

अटकेची आवश्यकता नाही

धार्मिक भावना दुखावल्या आणि हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना लैंगिक छळाचा प्रकारात मोडत नाही. त्यांचे मोबाइल जप्त केले आहेत. जबाब नोंदविल्यामुळे आरोपींच्या अटकेची आवश्यकता नाही.

- निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त