शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणासुदीत सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:49 IST

शहरातील गणेश नगर भागात राहणारे व भवानी अर्बन को-आॅप. बँकेच्या मुख्य शाखेचे वसुली व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या राहत्या घरावर बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या केली

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहरातील गणेश नगर भागात राहणारे व भवानी अर्बन को-आॅप. बँकेच्या मुख्य शाखेचे वसुली व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या राहत्या घरावर बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या केली. त्यांच्या दोन्ही मुलींवरह धारदार शस्त्राने बेदम मारहाण केली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ ठोकून होते.आदिनाथ उत्तम घाडगे (५४) व त्यांची पत्नी अलका (४८) या दोघांची चोरांनी हत्या केली. तसेच वर्षा संदीप जाधव (२६) या विवाहित मुलीसह स्वाती घाडगे या दोन मुलींना मारहाण करून गंभीर जखमी केले. घाडगे कुटूंबाने मंगळवारी रात्री सोबत जेवण केले. त्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर सर्वजण झोपले. तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी घराचे दार वाजवले. दार वाजल्याने अलका घाडगे यांनी दरवाजा उघडला. याचवेळी समोरील चोरांनी अलका घाडगे यांच्यावर शस्त्राने हल्ला करीत हत्या केली. तसेच पुढे जाऊन झोपलेल्या अजिनाथ घाडगे यांच्यावरही हल्ला करून त्यांना ठार मारले. विवाहित मुलगी वर्षा संदिप जाधव व स्वाती घाडगे या दोन्ही मुलींना पण पण शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले. सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना चोरांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज घेऊन पोबारा केला.जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी मुलींनी आरडाओरडा करून शेजारच्यांना जागे केले. नागरिकांनी जखमी दोन्ही बहिणींना बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दोघींचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिर, तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, नारायण खटाने आदी अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात याची नोंद झालेली नव्हती.१२ वर्षांपूर्वी पडला होता दरोडा५ जानेवारी २००५ रोजी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या घरी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत रखवालदार लक्ष्मण खटावकर याचा मृत्यू झाला होता. १२ वर्षानंतर पुन्हा जबरी चोरी करताना चोरांनी दाम्पत्याची हत्या करून त्यांच्या दोन मुलींना गंभीर जखमी केल्याची घटना घडली.मांजरसुंब्यात तीन दुकाने फोडलीबीड तालुक्यातील मांजरसुंबा येथेही मंगळवारी रात्री तीन दुकाने फोडून चोरांनी लाखोंचा ऐवज लांबवला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.