शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
3
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
4
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
5
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
7
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
8
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
9
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
10
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
11
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
12
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
13
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
14
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
15
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
16
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
17
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
18
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
19
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
20
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!

साडेआठ हजार लाभार्थी वंचित

By admin | Updated: July 20, 2014 00:36 IST

परभणी : दारिद्र्य रेषेखालील सर्वेक्षणामध्ये पात्र असताना देखील शहरातील ८ हजार ८२४ लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत़

परभणी : दारिद्र्य रेषेखालील सर्वेक्षणामध्ये पात्र असताना देखील शहरातील ८ हजार ८२४ लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत़ महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे या गोरगरीब नागरिकांना सहा वर्षांपासून शासकीय योजनांपासून दूर रहावे लागत आहे़ विशेष म्हणजे, नगरसेविका शांताबाई प्रभाकर लंगोटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही यंत्रणा गतिमान झालेली नाही. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत़ या योजनेच्या माध्यमातून घरकुल, सुवर्ण जयंती स्वयंरोजगार योजनेंतर्गत वित्तपुरवठा, रेशनकार्ड, विद्यार्थ्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र आदी वेगवेगळ्या सवलती मिळतात़ या योजनेच्या लाभासाठी २००५-०६ मध्ये शहरातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांचे सर्वेक्षण करण्यात आले़ या सर्वेक्षणात प्रगणकांनी केलेल्या चुकांमुळे व हलगर्जीपणामुळे पात्र असतानाही अनेक कुटुंबधारकांची नावे दारिद्र्य रेषेच्या अंतिम यादीत येऊ शकली नाहीत़ परभणी नगरपालिकेने दारिद्र्य रेषेखालील ३० हजार ६९८ कुटुंबधारकांची डाटा एंट्री केली होती़ यातील १३ हजार ६६५ कुटुंबांची नावे यादीत आली़ ज्या कुटुंबधारकांची नावे यादीत आली नाहीत़ त्यांच्याकडून जून २००८ मध्ये आक्षेप अर्ज मागविण्यात आले़ त्यांच्या आक्षेप अर्जानंतर नगरपालिकेने प्रत्यक्ष स्थळ पाहणी, शहनिशा, पडताळणी आणि चौकशी केली़ यातून ८ हजार ८२४ कुटुंंबधारकांची नोंदणी करण्यात आली़ परंतु, २००८ पासून अद्यापपर्यंत या आक्षेप अर्जावर निर्णय घेतला नसल्याने ८ हजार ८२४ पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत़ याप्रश्नी नगरसेविका शांताबाई लंगोटे यांनी सहा वर्षांपासून पाठपुरावा केला आहे़ नगरपालिका प्रशासनाचे आयुक्त, संचालक, पालकमंत्री सुरेश धस, औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापौर प्रताप देशमुख आदींकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही कारवाई झालेली नाही़ (प्रतिनिधी)ही तर गोरगरिबांची कुचेष्टा-लंगोटे४नियमानुसार वेळेच्या आत कागदपत्रांची पूर्तता करून आक्षेप सादर केल्यानंतर या प्रकरणी निर्णय देणे बंधनकारक असताना जाणीवपूर्वक दप्तरदिरंगाई होत आहे़ त्यामुळे ही एकप्रकारे गोरगरिबांची कुचेष्टा केल्यासारखे आहे आणि हा लाभार्थ्यांवर अन्याय आहे़ सहा वर्षांपासून कोणताही निर्णय न घेणे हे उदासीनतेचे लक्षण आहे़ प्रशासनाला कसल्याही प्रकारचे सामाजिक देणे-घेणे नसल्याचेच दिसते़ याप्रकरणी तत्काळ निर्णय न झाल्यास लाभार्थ्यांसह जनआंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेविका शांताबाई लंगोटे यांनी दिला़ सहा वर्षांपासून लाभार्थ्यांचे होत आहे नुकसाननगरपालिकेने प्रत्यक्ष स्थळपाहणी आणि शहानिशा करून हे ८ हजार ८२४ लाभार्थी निवडले आहेत़ परंतु, या लाभार्थ्यांची यादी वरिष्ठस्तरावर पाठविण्यास चालढकल होत आहे़ सहा वर्षांपासून या लाभार्थ्यांच्या आक्षेप अर्जावर निर्णय होत नसेल तर ती खेदाची बाब आहे़ हे लाभार्थी पात्र असून सहा वर्षांपासून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिले आहेत़ गोरगरीब नागरिकांचे जीवनमान उंचवावे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे, यासाठी शासन योजना राबविते़ परंतु, प्रशासकीय प्रक्रियेतील उदासीनतेमुळे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास बराच कालावधी जात आहे़