शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार क्युबिक मीटर गाळ काढला

By admin | Updated: May 13, 2016 00:17 IST

औरंगाबाद : महापालिकेने हर्सूल तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा दिवसांमध्ये ४ हजार ६३४ क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा कंत्राटदारासह मनपाकडून करण्यात येत आहे.

औरंगाबाद : महापालिकेने हर्सूल तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा दिवसांमध्ये ४ हजार ६३४ क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा कंत्राटदारासह मनपाकडून करण्यात येत आहे. तलावातील गाळ काढणे आणि तो नेऊन टाकण्यासाठी मनपा कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पंचक्रोशीतील शेतकरी स्वत:हून आपल्या वाहनातून गाळ नेत आहेत, हे विशेष.गुरुवार ५ मेपासून हर्सूल तलावातून गाळ काढण्यात येत आहे. शासनाने महापालिकेला गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मनपाने एका कंत्राटदाराला गाळ काढण्याचे टेंडर दिले आहे. सुरुवातीला अत्यंत संथगतीने गाळ काढण्याचे काम सुरू होते. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी गाळ काढण्यासाठी यंत्रणा वाढवावी असे आदेश मनपाला दिले. त्यानंतर आठ मशिन्स वाढविण्यात आल्या. दोन जेसीबी आणि पाच पोकलेन, एका बुलडोझरच्या साह्याने गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या वाहनांमधून १४८७ ट्रीप गाळ काढण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत गाळ काढण्याचे काम सुरूआहे. कंत्राटदाराने गाळ काढून तो दुसरीकडे नेऊन टाकण्यासाठी मनपा पैसे देत आहे. सर्वसामान्य शेतकरी आपल्या वाहनातून गाळ नेत असतील तर कंत्राटदार आपण गाळ काढून दुसरीकडे टाकला असा दावा करीत आहे. यामध्ये मनपाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे, हे निश्चित. कंत्राटदाराने दोन कोटी रुपयांमध्ये किती गाळ काढला हेसुद्धा लवकरच लक्षात येणार आहे.