शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

साडेचार हजार क्युबिक मीटर गाळ काढला

By admin | Updated: May 13, 2016 00:17 IST

औरंगाबाद : महापालिकेने हर्सूल तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा दिवसांमध्ये ४ हजार ६३४ क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा कंत्राटदारासह मनपाकडून करण्यात येत आहे.

औरंगाबाद : महापालिकेने हर्सूल तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा दिवसांमध्ये ४ हजार ६३४ क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा कंत्राटदारासह मनपाकडून करण्यात येत आहे. तलावातील गाळ काढणे आणि तो नेऊन टाकण्यासाठी मनपा कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पंचक्रोशीतील शेतकरी स्वत:हून आपल्या वाहनातून गाळ नेत आहेत, हे विशेष.गुरुवार ५ मेपासून हर्सूल तलावातून गाळ काढण्यात येत आहे. शासनाने महापालिकेला गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मनपाने एका कंत्राटदाराला गाळ काढण्याचे टेंडर दिले आहे. सुरुवातीला अत्यंत संथगतीने गाळ काढण्याचे काम सुरू होते. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी गाळ काढण्यासाठी यंत्रणा वाढवावी असे आदेश मनपाला दिले. त्यानंतर आठ मशिन्स वाढविण्यात आल्या. दोन जेसीबी आणि पाच पोकलेन, एका बुलडोझरच्या साह्याने गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या वाहनांमधून १४८७ ट्रीप गाळ काढण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत गाळ काढण्याचे काम सुरूआहे. कंत्राटदाराने गाळ काढून तो दुसरीकडे नेऊन टाकण्यासाठी मनपा पैसे देत आहे. सर्वसामान्य शेतकरी आपल्या वाहनातून गाळ नेत असतील तर कंत्राटदार आपण गाळ काढून दुसरीकडे टाकला असा दावा करीत आहे. यामध्ये मनपाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे, हे निश्चित. कंत्राटदाराने दोन कोटी रुपयांमध्ये किती गाळ काढला हेसुद्धा लवकरच लक्षात येणार आहे.