शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पावणदोन एकरात ७० क्विंटल हळद

By admin | Updated: July 7, 2014 00:32 IST

भास्कर लांडे, हिंगोली दरवर्षी घाती घेत असलेल्या कापसाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळदीच्या रूपाने नगदी पिकात पर्याय मिळाला.

भास्कर लांडे, हिंगोलीदरवर्षी घाती घेत असलेल्या कापसाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळदीच्या रूपाने नगदी पिकात पर्याय मिळाला. त्याला हिंगोलीत उपलब्ध असलेल्या आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या बाजारपेठेमुळे अधिकच वाव मिळाला. त्याचा फायदा उठवित उपलब्ध पाण्यात, आहे त्या जमिनीत, खत, बी, फवारणीच्या वेळेचे योग्य नियोजन जीवन क्यातमवार यांनी केले. त्याचा परिपाक पावणे दोन एकरात ७० हजारांच्या खर्चात वाळून ७० क्विंटल हळद झाल्याने सव्वाचार लाखांचे उत्पन्न काढण्याची किमया माजी सैैनिकाने केली. औंढा तालुक्यातील जामगव्हाण येथील जीवन क्यातमवार यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीत वेळ घालविण्याचा ठरविले. ‘पाण्याविना शेती अन् शेतकऱ्याची माती’ या म्हणीनुसार त्यांनी शेतात बोअर घेतला. योगायोगाने बऱ्यापैैकी पाणी लागल्याने शेती फुलविता आली. पाण्याची उपलब्धता झाली तरी केळी, संत्रा, पपई आदी फळपिके घेण्यापुरते भरमसाठ पाणी नव्हते. अधिक पाण्याचे पिकही घेता येत नव्हते आणि सात एकरातील पिकांना पाणी पुरत नव्हते. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाने शेतकऱ्यांना बेजार केले होते. भरमसाठ खर्च करूनही अपेक्षित उत्पादन होत नव्हते. उलट जमिनीतील कस नाहीसा होत होता. सुरूवातीला एक-दोन वर्षांत क्यातमवार यांना कापसाच्या पिकाचा अनुभव वाईट आला. म्हणून कापसाला दूर लोटीत क्यातमवार यांनी हळदीला जवळ केले. हळद पिकविण्यापेक्षा विकण्याला सर्वात महत्व असते. प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने हळदीला नकारले जाते; पण राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ हिंगोलीत आहे. वर्षभर बाजार समितीत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम भाव मिळतो. शिवाय हळदीलाही रास्त भाव मिळत असल्याचे पाहून क्यातमवार यांनी गतवर्षी मृगनक्षत्रात पावणे दोन एकर जमीन हळद लागवडीसाठी तयार केली. जमिनीची योग्य मशागत करून शेलम जातीच्या १५ क्विंटल बियाण्यांची लागवड बेड पद्धतीने केली. २१ दिवसानंतर निघालेल्या हळदीला बरोबर एक महिना झाल्यानंतर पोटॅश आणि १०:२४:२४ खताचे सात पोते टाकले. दरम्यान पीक वाढत जात असताना कोळपणी, निंदणी करण्यात आली. हळदीला माल लागतेवेळी ६ पोते डीएपी आणि चार पोते पोटॅश खताचा दुसरा डोस दिला. एकीकडे पीक वाढत असताना आलेल्या धुईमुळे रोगराईचे आक्रमण होत राहिले. खासकरून बुरशीची वाढ होत राहिल्याने चारवेळेस फवारणी करावी लागली. मान्सूनचा पाऊस संपताच ठिबकद्वारे पिकास पाणी दिले. परिणामी पाण्याची बचत झाली, पुरेशा प्रमाणात पाणी मिळाल्याने फळधारणा चांगली झाली. नुकत्याच संपलेल्या हंगामात काढण्यात आलेली हळद वाळविण्यात आली. वाळवून मोजलेली हळद ७० क्विंटल भरली. दुर्देवाने बाजारभाव घसरून ६ हजारांवर आल्याने हळद विक्री लांबविली. वर्षभर दिवसरात्र एक करून लावलेली हळद विक्रीला येताच भाव घसरल्याने क्यातमवार निराश झाले; परंतु आजघडीला उपलब्ध ६ हजारांच्या भावात ७० क्विंटल हळद विकली तरी सव्वाचार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. केवळ ७० हजारांच्या खर्चात यापूर्वी कोणत्याही पिकाचे उत्पादन झाले नव्हते. कितीही खर्च केला तरी कापूस अपेक्षीत उत्पादन देत नव्हता; पण हळदीने केलेल्या खर्चाची चीज करीत विक्रमी ७० क्विंटल उत्पादन दिले. आता हळदीच्या रूपयाने नगदी पिकात पर्याय मिळाला. तर कमी खर्चात, कमी पाण्यात विक्रमी उत्पादन घेण्याचा आटोपही आल्याचे क्यातमवार म्हणाले.