शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

डीसी रुल्सवरील सेनेचे आक्षेप केवळ लक्ष वेधण्यासाठीच

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

औरंगाबाद : राज्यातील ‘ड’ वर्ग मनपांसाठी तयार केलेली नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) औरंगाबाद मनपाला लागू करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे;

औरंगाबाद : राज्यातील ‘ड’ वर्ग मनपांसाठी तयार केलेली नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) औरंगाबाद मनपाला लागू करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे; परंतु सेनेचे आक्षेप वरवरचे आणि केवळ लक्ष वेधून घेण्यासाठीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने महिनाभरापूर्वीच नवीन विकास नियंत्रण नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध केला. ड वर्ग मनपांसाठीची ही नियमावली क वर्गातील औरंगाबाद मनपालाही लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला सेनेने नगररचना खात्याकडे आठ मुद्यांच्या आधारे आक्षेप घेतला. मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी हे आक्षेप नोंदविले गेले. ही नियमावली लागू झाल्यास बिल्डरांचाच अधिक फायदा होईल, असा दावा सेनेच्या वतीने गट नेते रेणुकादास वैद्य यांनी केला आहे; परंतु सेनेने घेतलेल्या आक्षेपांमध्ये फारसे तथ्य नसल्याचे नगररचना विषयातील जाणकारांचे म्हणणे आहे. खुल्या जागांबाबत एकूण क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्र खुली जागा म्हणून प्रस्तावित करण्याचे नियमावलीत नियोजित आहे. मात्र, औरंगाबाद मनपाने १५ टक्के खुली जागा सोडण्याचे धोरण ठरविले आहे. तसेच उच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे, असा सेनेचा आक्षेप आहे; परंतु औरंगाबाद मनपात १९९१ पासून १० टक्केच खुल्या जागेचा नियम आहे. त्याआधी १९८२ साली औरंगाबाद नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. तेव्हापासून १९९१ पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कोल्हापूर मनपातील विकास नियंत्रण नियमावली आदर्श म्हणून अवलंबिली होती. त्याच काळात १५ टक्के खुल्या जागेचा नियम होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. औरंगाबाद मनपा तांत्रिकदृष्ट्या क वर्गात गेली असली तरी इथे मुंबई, पुणे, नागपूरसारख्या क वर्गातील मनपा क्षेत्रांसारखी विकासाची गती नाही. त्यामुळे इथे विकासाच्या दृष्टीने ड वर्गातील नियमावलीच फायदेशीर ठरेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सेनेने घेतलेले इतर आक्षेपही पश्चातबुद्धीचे आणि लक्षवेध करण्यासाठीच असल्याचे काहींचे मत आहे. आक्षेपांवर सेना ठाम दरम्यान, सेनेचे गट नेते रेणुकादास वैद्य यांनी मात्र सेनेने घेतलेले आक्षेप योग्यच असल्याचा दावा केला आहे. विकास नियमावलीवर कोणीच आक्षेप घेतलेले नव्हते. म्हणून ऐनवेळी शेवटच्या दिवशी आम्ही आक्षेप नोंदविले. हे आक्षेप घाईघाईने नोंदविले गेले; परंतु जेव्हा आम्हाला सुनावणीसाठी बोलावले जाईल तेव्हा प्रत्येक मुद्देनिहाय बाजू मांडली जाईल. लोकहिताचा विचार करूनच हे आक्षेप घेतलेले आहेत, असेही वैद्य म्हणाले.