शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

डीसी रुल्सवरील सेनेचे आक्षेप केवळ लक्ष वेधण्यासाठीच

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

औरंगाबाद : राज्यातील ‘ड’ वर्ग मनपांसाठी तयार केलेली नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) औरंगाबाद मनपाला लागू करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे;

औरंगाबाद : राज्यातील ‘ड’ वर्ग मनपांसाठी तयार केलेली नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) औरंगाबाद मनपाला लागू करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे; परंतु सेनेचे आक्षेप वरवरचे आणि केवळ लक्ष वेधून घेण्यासाठीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने महिनाभरापूर्वीच नवीन विकास नियंत्रण नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध केला. ड वर्ग मनपांसाठीची ही नियमावली क वर्गातील औरंगाबाद मनपालाही लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला सेनेने नगररचना खात्याकडे आठ मुद्यांच्या आधारे आक्षेप घेतला. मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी हे आक्षेप नोंदविले गेले. ही नियमावली लागू झाल्यास बिल्डरांचाच अधिक फायदा होईल, असा दावा सेनेच्या वतीने गट नेते रेणुकादास वैद्य यांनी केला आहे; परंतु सेनेने घेतलेल्या आक्षेपांमध्ये फारसे तथ्य नसल्याचे नगररचना विषयातील जाणकारांचे म्हणणे आहे. खुल्या जागांबाबत एकूण क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्र खुली जागा म्हणून प्रस्तावित करण्याचे नियमावलीत नियोजित आहे. मात्र, औरंगाबाद मनपाने १५ टक्के खुली जागा सोडण्याचे धोरण ठरविले आहे. तसेच उच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे, असा सेनेचा आक्षेप आहे; परंतु औरंगाबाद मनपात १९९१ पासून १० टक्केच खुल्या जागेचा नियम आहे. त्याआधी १९८२ साली औरंगाबाद नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. तेव्हापासून १९९१ पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कोल्हापूर मनपातील विकास नियंत्रण नियमावली आदर्श म्हणून अवलंबिली होती. त्याच काळात १५ टक्के खुल्या जागेचा नियम होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. औरंगाबाद मनपा तांत्रिकदृष्ट्या क वर्गात गेली असली तरी इथे मुंबई, पुणे, नागपूरसारख्या क वर्गातील मनपा क्षेत्रांसारखी विकासाची गती नाही. त्यामुळे इथे विकासाच्या दृष्टीने ड वर्गातील नियमावलीच फायदेशीर ठरेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सेनेने घेतलेले इतर आक्षेपही पश्चातबुद्धीचे आणि लक्षवेध करण्यासाठीच असल्याचे काहींचे मत आहे. आक्षेपांवर सेना ठाम दरम्यान, सेनेचे गट नेते रेणुकादास वैद्य यांनी मात्र सेनेने घेतलेले आक्षेप योग्यच असल्याचा दावा केला आहे. विकास नियमावलीवर कोणीच आक्षेप घेतलेले नव्हते. म्हणून ऐनवेळी शेवटच्या दिवशी आम्ही आक्षेप नोंदविले. हे आक्षेप घाईघाईने नोंदविले गेले; परंतु जेव्हा आम्हाला सुनावणीसाठी बोलावले जाईल तेव्हा प्रत्येक मुद्देनिहाय बाजू मांडली जाईल. लोकहिताचा विचार करूनच हे आक्षेप घेतलेले आहेत, असेही वैद्य म्हणाले.