शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

सेना-भाजपात नगराध्यक्ष पदाची टोलवाटोलवी...!

By admin | Updated: November 2, 2016 01:09 IST

जालना नगर परिषद निवडणूक सध्या विविध कारणांनी गाजत आहे.

राजेश भिसे जालनानगर परिषद निवडणूक सध्या विविध कारणांनी गाजत आहे. नगराध्यक्ष पद हे यंदा जनतेतून निवडले जाणार असून, पालिका हद्दीतील मतदारांची गणिते पाहता या पदाबाबत मात्र युतीत टोलवाटोलवी सुरू असल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनीही हे पद शिवसेनेने घ्यावे, असा आग्रह धरल्याने सेना आणि भाजपाचे नेते पेचात पडले आहेत. युती आणि आघाडीशिवाय पालिकेत सत्ता मिळविणे शक्य नसल्याचे उमगल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडी आणि युती झाली. काँग्रेसमधून नगराध्यक्ष पदासाठी संगीता कैलास गोरंट्याल आणि पद्मादेवी भरतीया यांनी उमदेवारी अर्ज भरले आहेत. तर शिवसेनेतर्फे शोभाताई भास्कर अंबेकर आणि भाजपातर्फे सुशिलाताई भास्कर दानवे यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे सर्वांनी पक्षाचा बी फॉर्मदेखील दाखल केलेला आहे. मतांचे गणित जुळत नसल्याने सर्वच प्रमुख पक्षांचे नेते पेचात आहेत. धर्म आणि जातीनिहाय मतांचा विचार करता सेना आणि भाजपा नेत्यांची नगराध्यक्ष पदाबाबत टोलवाटोलवी सुरु असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला भाजपाने या पदासाठी आग्रह धरला असला तरी मतांचे गणित जुळत नसल्याचे दिसून येताच शिवसेनेने हे पद घ्यावे, असा भाजपा नेत्यांचा आग्रह आहे. एकूणच ही निवडणूक आणि यामागचे अर्थकारण या बाबी आवाक्याबाहेरच्या असल्याचे सेना नेत्यांचे म्हणणे आहे. युतीचा उमदेवार जाहीर होण्याची प्रतीक्षा आघाडीचे नेते करीत आहेत. युतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला की आघाडीची पुढील रणनिती ठरणार आहे. त्यामुळेच आघाडी करताना नगराध्यक्ष पद वाट्याला आलेल्या काँग्रेसने दोन अर्ज भरले आहेत. युतीचा उमेदवार ठरला की काँग्रेसही आपली भूमिका स्पष्ट करेल, असेच चित्र तूर्तास तरी दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर ही असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. तद्नंतरच नगरसेवक पदासाठी किती उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी कोण रिंगणात राहतो, याकडे जालनेकरांचे लक्ष लागून आहे.