शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

खरिपाचे क्षेत्र वाढले

By admin | Updated: May 6, 2016 23:57 IST

औरंगाबाद : खरीप हंगामामध्ये पिकांचे नियोजन, जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पीक पद्धतीत बदल, पावसाचा खंड किंवा उशिरा पाऊस आल्यास कोणती काळजी घ्यावी,

औरंगाबाद : खरीप हंगामामध्ये पिकांचे नियोजन, जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पीक पद्धतीत बदल, पावसाचा खंड किंवा उशिरा पाऊस आल्यास कोणती काळजी घ्यावी, आंतरपीक पद्धतीचे फायदे अशा विविध बाबींवर शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद कृषी विभागाने हाती घेतला असून, पुढील आठवड्यापासून प्रत्येक तालुक्यातील प्रमुख ५-१० गावांमध्ये कृषी अधिकारी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी आनंद गांजेवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी ‘कमी खर्चात अधिक उत्पादन’ कसे घ्यावे, याबद्दल कृषी विभागाने एक अभियान हाती घेतले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच गावागावांत घेण्यात आलेल्या किसान सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पुढील आठवड्यात गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील ५-१० गावे निवडली जाणार आहेत.ज्या गावांतील शेतकऱ्यांची ऐकून घेण्याची तयारी असेल, अशा गावांची निवड करून तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी हे तेथे जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यामध्ये खरीप शेतीचे नियोजन कसे करावे, पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत कमी पावसात कोणते पीक उपयुक्त राहील, उशिरा पाऊस आल्यास कोणते पीक फायद्याचे राहील, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कोणती पिके घ्यावी लागतील, कंपोस्ट खतांची निर्मिती आणि त्याचा वापर कसा करावा, आंतरपीक आदींबद्दल अधिकारी हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देतील.